Tarun Bharat

Panhala Fort: किल्ले पन्हाळगडाचे अस्तित्व पुन्हा धोक्यात

Kolhapur Panhala Fort : किल्ले पन्हाळगडावरील तटबंदी पुन्हा ढासळली आहे. राजदिंडी मार्गांवरील तटबंदी आज (ता. २१) पहाटे ढासळली. यामुळे शेजारील बुरुजाला ही त्याचा धोका निर्माण झाला आहे. तातडीने उपाययोजना न केल्यास उर्वरित तटबंदी ढासळण्याची शक्यता आहे. यामुळे गडाखालील वाड्या वस्तीतील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

दर पावसाळ्यात किल्ले पन्हाळगडावरील एक बुरुज ढासळतो. तर ठिकठिकाणी तटबंदी ढासळाला लागली आहे. याकडे पुरातत्व विभागाने सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अनेकदा गडप्रेमी आणि शिवप्रेमींनी केला आहे. पुरातत्व विभागाला जागे करण्यासाठी काही दिवसापूर्वी राज्यातील गडप्रेमी ऐतिहासिक पन्हाळगडावर हजारोंच्या संख्येने दाखल झाले होते. राज्यातून पुणे, नाशिक, परभणी, उस्मानाबाद, नागपूर, मुंबईतून हे गडप्रेमी किल्ले पन्हाळगडावर आले होते. पन्हाळगडाचे संवर्धन होण्यासाठी राज्य सरकारने गडकिल्ल्यांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी, तातडीने संवर्धन करून पुरातत्व विभागाने सहकार्याची भूमिका घ्यावी, अशी मागणी केली होती.

Related Stories

बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देत, पंकजा मुडेंनी परळी दौरा केला रद्द

Tousif Mujawar

TMC ला धक्का; ऐन निवडणुकीत 5 आमदार भाजपात

datta jadhav

“कसं काय शेलार बरं हाय का?”, भाजप कार्यालयासमोर शिवसेनेची पोस्टरबाजी

Archana Banage

कोल्हापूर : सातार्डेच्या आजीबाईंनी दिला महावितरणला आधार

Archana Banage

कोरोना लस विकसित करण्याच्या अंतिम टप्प्यात ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ कंपनी : राष्ट्राध्यक्ष ट्रम्प

Tousif Mujawar

कोल्हापुरातील मराठा मोर्चात प्रकाश आंबेडकरही होणार सहभागी

Archana Banage