नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील अनेक राज्यांमध्ये संततधार पावसामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. गुरुवारी जम्मू-काश्मीर आणि हिमाचलमध्ये ढगफुटी झाल्यामुळे दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास पहाडी भागांमध्ये काही भागात ढगफुटीसदृश पाऊस कोसळल्यामुळे लोकांची तारांबळ उडाली. नदी-नाल्यांचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे काही लोक बेपत्ता झाल्याचेही समजते. उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या पावसाचा जोर वाढला असून काही भागात पूरस्थितीही निर्माण झालेली आहे. देशात सध्या सर्वदूर पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचवेळी ओडिशा, छत्तिसगड, महाराष्ट्र, गुजरात, कोकण, गोवा, आणि तेलंगणामध्ये मुसळधार पावसाची शक्मयता आहे. याचदरम्यान, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि बिहारमध्ये हलक्मया पावसाची शक्मयता वर्तवण्यात आली आहे.