संग्राम काटकर,कोल्हापूर
Kolhapur News : कसबा बावड्यातील राजर्षी शाहू महाराज जन्मस्थळ स्मारकावरील जागेत दीडशेहून अधिक प्रकाराच्या प्राचीन कालिन शिल्पांचा ठेवा आहे.अंबाबाई मंदिर परिसरासह ठिकठिकाणच्या खोदकामातून हा सगळा शिल्पांचा ठेवा सापडला आहे.पाषाणात बनवलेल्या या शिल्पांवरील नक्षीकाम मन मोहून टाकेल,असेच आहे.ही सगळी शिल्पे बाराव्या शतकातील असल्याचे अभ्यासकांचे सांगणे आहे.गेली कित्येक दशके उघड्यावर राहून या शिल्पांनी उन्ह,वारा,पाऊस झेलला आहे.त्यांना आता शाहू जन्मस्थळानजिकच्या मोठ्या आणि हक्काच्या जागेत निवारा देऊन जतन केले जाणार आहे.त्यासाठी पुरातत्व विभाग,कोल्हापूर शिल्प दालन बांधणार असून पर्यटकांना हा प्राचिन शिल्पांचा ठेवा पाहण्याचा आनंद मिळणार आहे.
शाहू जन्मस्थळ (लक्ष्मी विलास पॅलेस) स्मारक पाहण्यास गेलेल्या सर्वांना पाषाणात नक्षीकाम कऊन साकारलेल्या सर्व शिल्पांचे अगदी हमखास दर्शन घडते. या शिल्पांमध्ये शिलालेख,विरगळ,शिवलिंग,गणेशमूर्ती,मंदिर-वाड्यांचे नक्षीदार खांब,हौद,छोट्या मंदिराचे शिखर,नक्षीकाम केलेली प्रतिके, कोरिवकाम कऊन बनवलेले प्राणी,देवदेवतांच्या मूर्ती यासह 150 हून अधिक शिल्पांचा समावेश आहे.यातील बरीच शिल्प हे अंबाबाई मंदिर व परिसरात विविध कारणांनी केलेल्या खोदाईतून मिळाली आहेत.काही शिल्प गडहिंग्लज,आजरा,चंदगड व रायबाग (कर्नाटक) यासह ठिकठिकाणी घराचा पायासह अन्य कामांसाठी केलेल्या खोदाईतून मिळाली आहेत.त्यांचे जतन व संवर्धन टाऊन हॉलमधील कोल्हापूर वस्तूसंग्रहालयाने गेली अनेक वर्षे केले.
1990 साली सर्व शिल्पे कसबा बावड्यातील राजर्षी शाहू जन्मस्थळ स्मारकाच्या जागेत हलवण्यात आली.असे असले तरी ही शिल्पे टाऊनप्रमाणे आजही उघड्यावर ठेवली आहेत.शाहू जन्मस्थळाचे नुतणीकरण झाल्यानंतर त्यांना स्थळावरीलच चांगल्या जागेत ठेवले जाईल,असे सर्वांना वाटत होते.पण तसे घडले नाही.त्यामुळे उघड्यावरील देवदेवतांच्या मूर्ती,विरगळ,शिलालेख आणि नक्षीदार खांब पाहून लोक हळहळ आणि संतापही व्यक्त करत होते.गेली कित्येक वर्षे उन्ह,वारा आणि पाऊस या शिल्पांनी सोसला असून ती भग्नावस्थेत गेली आहे.आणखी काही वर्षे अशी निघून गेली तर शिल्पांना इजा होईल याचा विचार कऊन पुरातत्व विभागाने शिल्प दालन तयार कऊन त्यामध्ये हे सगळे शिल्प ठेवण्याचा निर्णय 8 वर्षांपूर्वी घेतला होता.मात्र दालनासाठी जी जागा नियोजित केली होती ती जागा राहुरी कृषी विद्यापीठाच्या ताब्यात होती.त्यामुळे दालन बांधणे पुरातत्व विभागाला शक्य होत नव्हते.मात्र विभागाने केलेल्या हालचालीमुळे कृषी विद्यापीठाकडील जागा शाहू जन्मस्थळाला परत मिळेल अशी चिन्हे निर्माण झाली आहे.त्यामुळे शिल्प दालन बांधणी कामातील जागेचा अडसरच नाहीसा झाला आहे.आता लवकरच दालन बांधण्यासाठी हालचाली कऊन शिल्पांना त्यात ठेवले जाणार आहे.शाहू जन्मस्थळ पाहण्यास येणाऱ्या पर्यटकांना प्राचीन शिल्पांचा हा ठेवा डोळ्यात साठवता येणार आहे.
राहुरी कृषी विद्यापीठाकडील शाहू जन्मस्थळ स्मारकाची जागा परत मिळवण्यासाठी पुरातत्व विभागाने सक्रीय आहे.जागा ताब्यात घेण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून जागेची दोन-तीन वेळा मोजणीही कऊन घेतली आहे.कृषी विद्यापीठाने जागा देण्यास होकार दिला आहे.आता लवकरच जागा स्मारकाच्या सातबारावर वर्ग करवून घेतली जाईल.आराखडा तयार सर्व बाजूंनी सुसज्ज असे शिल्प दालन बांधले जाईल.
उत्तम कांबळे (उपअविक्षक : पुरातत्व विभाग, कोल्हापूर)