गणपत गल्ली येथील प्रकार ः वजनात फरक
बेळगाव / प्रतिनिधी
गणपत गल्ली येथील फिरत्या फळविक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट केली जात आहे. वजनामध्ये तब्बल 200 ते 250 ग्रॅम फरक होत असल्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत आहे. वजनाबद्दल विक्रेत्यांना जाब विचारला असता त्यांच्याकडून उलटसुलट उत्तरे नाहीतर अरेरावी करण्यात येते. त्यामुळे यावर तोडगा काढून ग्राहकांची फसवणूक कशी टाळता येईल? याचा विचार करावा लागणार आहे.
गणपत गल्ली, कांबळी खूट या परिसरात अनेक फळविक्रेते फळांची विक्री करतात. त्यांच्या वजनकाटय़ामध्ये बऱयाचदा फरक असतो. काहीवेळा तर वजनाऐवजी प्लास्टिकमध्ये भरलेले दगड ठेवले जातात. शहराच्या मध्यवर्ती भागात असे प्रकार होत असले तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे दररोज शेकडो नागरिकांची फसवणूक केली जात आहे. मंगळवारी एका शिक्षकाने दीड किलो सफरचंद खरेदी केले. वजन कमी असल्याचे जाणवल्याने त्यांनी जवळच्या दुकानात जाऊन शहानिशा करून पाहिली असता तर एक किलो अडीचशे ग्रॅम इतकेच वजन भरले. यामुळे जाब विचारण्यास गेले असता विक्रेत्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.
सडक्या फळांनी भरलेली काळी पिशवी
वजनामध्ये तर फरक येतोच, त्याचबरोबर ग्राहकांचे लक्ष विचलित करून त्यांना सडकी फळे दिली जातात. प्रत्येक विक्रेत्याकडे सडकी फळे भरलेली एक काळय़ा रंगाची पिशवी वजन काटय़ाच्या शेजारीच असते. ग्राहक खिशातून पैसे काढेपर्यंत निवडलेली फळे बाजूला काढत सडक्या फळांची पिशवी वजनकाटय़ावर ठेवली जाते. यामुळे अनेक ग्राहकांची फसवणूक होत आहे.
वजन-माप खाते सुस्त
वजन, माप विभागाकडून प्रत्येक विपेत्याच्या वजन काटय़ाची तपासणी करणे गरजेचे आहे. परंतु असे होत नसल्याचा फायदा घेत फळविपेत्यांकडून ग्राहकांची लुबाडणूक होते. सुशिक्षित गिऱहाईक विपेत्यांसोबत वाद घालणे टाळतात. याचाच गैरफायदा उचलत विपेते खराब फळे विक्री करतात. त्यामुळे या प्रकारांना वेळीच आळा घालणे गरजेचे आहे.