पुणे / प्रतिनिधी :
‘कसबा’ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. आताच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ मतदारांपर्यंत पोचण्यासाठी आम्ही सूक्ष्म स्तरांवर नियोजन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले विकासकामे ही जनतेपर्यंत पोचली आहेत. मतदारांपर्यंत पोचण्यासाठी आम्ही पदयात्रा, कोपरा सभा, मेळावे आदींचे नियोजन केले आहे. तसेच शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी येणार आहे, अशी माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली.
मिसाळ म्हणाल्या, राज्यात महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू आहे. संजय राऊत हे नाना पटोले यांच्यावर टीका करीत आहेत. आमदार प्रणिती शिंदे व आमदार रोहित पवार यांच्यात सुरू असलेला वाद यावरून महाविकास आघाडीमध्ये आलबेल नाही, हे समजते. अशीच परिस्थिती कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळी दिसून येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण हे कसब्यात गेले आहे. त्यामुळे कसब्याची निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस अशी नाही, तर हिंदुत्व विरुद्ध काँग्रेस अशी आहे. काँग्रेसने नेहमीच हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका घेतली असल्याचे मिसाळ यांनी नमूद केले.
अधिक वाचा : महाशक्तीकडून राज्यात लोकशाहीची हत्या