तब्बल 12 वर्षांपासून रखडलाय मुंबई-गोवा महामार्ग
राजेंद्र शिंदे / चिपळूण
रायगड जिल्हय़ातील पळस्पे ते सिंधुदुर्गमधील झाराप या 366 कि.मी.च्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम तब्बल 12 वर्षानंतरही अपूर्ण अवस्थेत आहे. या महामार्गाया मागाहून मंजूर झालेला मुंबई-नागपूर समृध्दी महामार्ग पूर्ण झाला असताना कोकणातील प्रवास अजूनही खड्डय़ातूना सुरू आहे. देशभर रस्ते बांधणीत विक्रम करणारे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे गुरूवारी रत्नागिराया दौऱयावर येत आहेत. त्यामुळे आता कोकणही ‘समृध्दी’ाााr वाट पाहत आहे, अशा प्रकारी आर्जव वैतागलेले कोकणवासीय गडकरी यांयाकडे करीत आहेत.
महाराष्ट्र व गोवा या 2 राज्यांना जोडणारा महत्वाचा हा एकूण 450 किलोमीटरचा महामार्ग आहे. यामध्ये इंदापूर ते झाराप अशा 366 किलोमीटरच्या चौपदरीकरण कामाला 2013 मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळाली. प्रारंभी 11 हजार 745 कोटी रुपयांची तरतूद यासाठी करण्यात आल्यानंतर प्रत्यक्ष कामाला 2017-18 मध्ये सुरुवात झाली. काम वेगाने व्हावे, या हेतूने 35 ते 40 कि.मी. अंतराचे टप्पे करून वेगवेगळय़ा कंपन्यांना कंत्राटे देण्यात आली. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिह्यात कशेडी बोगदा सोडून एकून दहा टप्प्यांमध्ये काम सुरू आहे. त्यातील सध्यस्थितीत सिंधुदुर्गतील तळेगांव ते कळमठ, कळमठ ते झाराप आणि रत्नागिरीतील वाकेड ते तळेगांव हे तीनही टप्पे पूर्णत्वास गेले आहेत. त्यामुळे झाराप ते वाकेड हा 118 कि.मी.चा प्रवास वेगवान झाला आहे.
संगमेश्वर, रत्नागिरी टप्पे रखडले
रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 2 जिल्हय़ांचा विचार केला तर एकूण 7 टप्यांपैकी 3 टप्पे पूर्णत्वास गेले आहेत. कशेडी बोगद्याााs खोदकामो काम 81.64 टक्के पूर्ण झाले असून मे पर्यंत एक लेन वाहतुकीस खुली करण्यो नियोजन आहे. खेडचा टप्पाही पूर्णत्वाच्या मार्गावर असून केवळ परशुराम घाटातील सव्वा कि.मी.ााs काम सुरू आहे. परशुराम ते आरवली या चिपळूण टप्प्यातील कामही 84.10 टक्के पूर्ण झाले आहे. यात कोकणातील सर्वात मोठा उभारला जाणारा उड्डाणपूल, परशुराम घाट व सावर्डे येथील कामे सुरू आहेत. मात्र या संपूर्ण चौपदरीकरणात सुरूवातीपासूनच सर्वात पिछाडीवर असलेला टप्पा म्हणजे संगमेश्वरमधील आरवली ते तळेकांटे त्यो काम जेमतेम 24.86 टक्के तर काटे ते वाकेडमध्ये 26.90 टक्के इतका झाले आहे. महामार्गात हे दोन टप्पे अधिक काळ रेंगाळले आहेत.
‘मुंबई–गोवा’ला समृध्दी कधी?
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गच्या मागून मंजूर झालेला मुंबई-नागपूर हा समृध्दी महामार्ग पूर्णत्वास जाऊन त्याचे काही महिन्यांपूर्वी उद्घाटनही झाले. त्यामुळे रखडलेल्या मुंबई-महामार्गबाबत कोकणवासियांत राज्यकर्त्यांविरोधात संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे कोकणातून जाणाऱया मात्र अनेक वर्षे रखडलेल्या या महामार्गाला समृध्दी कधी येणार, असा सवाल कोकणवासीय केंद्रीय मंत्री गडकरी यांना करत आहेत.
उााा न्यायालय फटकारतेय तरीही…
रखडलेल्या महामार्गाबाबत कोकणचे सुपूत्र ऍड. ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर गेली अनेक वर्षे सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने वारंवार सरकारला फटकारत आली आहे. मात्र सरकार प्रत्येकवेळी प्रतिज्ञापत्र देत पुढाया तारखा देत आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय प्राधिकरणाने महामार्ग चौपदरीकरणाबाबत नव्याने प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात इंदापूर ते वडपाले मे 23 पर्यंत, वडपाले ते भोगाव डिसेंबर 22 पर्यंत, भोगाव खुर्द ते कशेडी मार्च 23 पर्यंत, कशेडी ते परशुराम डिसेंबर 22 पर्यंत, परशुराम ते आरवली जून 23 पर्यंत, आरवली ते तळेकांटे, वाकेड हे दोन्ही टप्पे डिसेंबर 23 पर्यंत पूर्ण होण्याची कालमर्यादा नमूद केली आहे.
गडकरींकडून कोकण दुर्लक्षित
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. त्यांच्याच प्रयत्नातून महामार्गाला खऱया अर्थाने चालना मिळाली. एकीकडे गडकरी रस्ते बांधणीचे विक्रमावर विक्रम रचत असताना त्यांच्या दरबारी मुंबई-गोवा महामार्ग काहीसा दुर्लक्षित राहिला आहे. त्यांच्याच मंत्रालयाने दिलेल्या कंत्राटदार कंपन्या काम करत नाहीत, हेही त्याना माहित नाही का, की कोकणात त्याया भारतीय पक्षाााs फार काही अस्तित्व नाही म्हणून मुद्दाम तर या महामार्गाकडे दुर्लक्ष करीत नाही ना, अशी शंका कोकणवासीय व्यक्त करीत आहेत.
मिऱया–कोल्हापूर, सागरी महामार्गलाही गती अपेक्षित
कोकणात समृद्धी आणू शकणाऱया रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गसह मिऱया-कोल्हापूर-नागपूर या नव्या महामार्ग कामालाही गती आवश्यक आहे. कोकणातील समुद्रकिनाऱयांवरील गावे आणि शहरांना जोडणारा, पर्यटनाला चालना देणारा व मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय ठरू शकेल, अशा विविध उद्दिष्टांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी 1980 च्या आसपास पहिल्यांदा या सागरी महामार्गी संकल्पना मांडली. त्यानुसार या मार्गावरील रस्त्याची कामे पूर्णही करण्यात आली होती. मात्र खाडय़ांवरील पुलांची कामे रखडल्याने पुढे हे काम रखडले. कोकण किनारपट्टीवरील 96 पर्यटन स्थळे या सागरी मार्गाला जोडली जाणार असल्याने ज्या नेटाने समृद्धी महामार्गाचे काम झाले, त्याच नेटाने सागरी महामार्ग तसा नव्या मिऱया-कोल्हापूर-नागपूर या महामार्ग कामाला गती देणे गरजेचे आहे.