कोल्हापूर गांधीनगर मध्ये वृत्त कळताच जल्लोषी आनंदाचे वातावरण
उचगाव/प्रतिनिधी
गांधीनगर ता. करवीर येथील पाच बंगला परिसरात राहणाऱ्या कविता चावला ( निरंकारी) या ४५ वर्षीय गृहिणी कौन बनेगा करोडपती सीजन १४ मध्ये एक करोड रक्कम जिंकून पहिल्या करोडपती बनण्याचा मान पटकावला आहे. तसेच १६ लाखांची कारही त्यांनी जिंकली. हे वृत्त गांधीनगर मध्ये कळताच उत्साह व आनंदाचे वातावरण पसरले. आपला मुलगा विवेक चावला तसेच आई-वडीलां समवेत कविता चावला या कौन बनेगा करोडपती शो मध्ये सामील झाल्या आहेत. शिक्षणाची आवड, जनरल नॉलेज, जिद्द या जोरावर सामान्य गृहिणी ते करोडपती महिला अशी झेप घेतल्याने कोल्हापूर गांधीनगर मध्ये विशेषतः सिंधी समाजामध्ये जल्लोषाचे व आनंदाचे वातावरण आहे. सोनी टीव्हीवर येत्या सोमवारी व मंगळवारी या शोचे प्रसारण होणार आहे.अजून सात करोड चा प्रश्न जिंकला की नाही हे स्पष्ट व्हायचे आहे.
कविता चावला यांचे लहानपणी चे शिक्षण कुडाळ सारख्या लहान गावात झाले आहे. त्यांनी आपले शिक्षण मराठी माध्यमातून घेतलेले आहे. सध्या त्या पाच बंगला गांधीनगर येथे मुलग्या सह राहतात. २००० मध्ये कौन बनेगा करोडपती ची सुरुवात झाल्यापासून त्या शो एडिशन देत आहेत.२०२० साठी कोविड मुळे त्यांना इंटरव्ह्यूसाठी कॉल आला नाही. २०२१ मध्ये त्या फास्टेस्ट फिंगर पर्यंत पोहोचल्या. मात्र हॉट सीट पर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. पण कविता यांनी जिद्द सोडली नाही. या जिद्दीच्या जोरावरच २०२२ मध्ये त्यांनी हॉट सीट मिळवली.
अभिताभ बच्चन यांच्यासमोर एका मागून एक अशी अचूक उत्तरे देत त्यांनी एक करोड ही रक्कम जिंकून या सीझनच्या त्या पहिल्या महिला करोडपती बनल्या आहेत. या शो दरम्यान अमिताभ बच्चन यांनीही कविता चावला यांच्या आत्मविश्वासाबद्दल, कोल्हापूर बद्दल गौरवोद्गार काढलेले आहेत. कविता यांनी याबरोबरच सोळा लाखाची कार ही जिंकलेली आहे. आपला मुलगा विवेक यास परदेशी शिक्षणासाठी पाठवण्याची त्यांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांची ही धडपड चालली आहे. एकूणच हे वृत्त समजताच कोल्हापूर सह गांधीनगर येथे अतिशय उत्साहाचे ,आनंदाचे व जल्लोषी वातावरण आहे .सर्वसामान्य सिंधी समाजातील महिला आपल्या शिक्षणाच्या जोरावर जिद्दीच्या