खानापूर : शहर परिसरात अनेक घरांमध्ये दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा केला जातो. दीड दिवसाच्या गणरायाचे गुरुवारी सायंकाळी विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणा देत, मलप्रभा नदी घाटावर गणरायांचे विसर्जन करण्यात येत होते. गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस नाही त्यामुळे नदी पात्रातील पाणी कमी झाल्याने विसर्जन सुरळीत होत आहे.
दीड दिवसाच्या गणपती पूजनाची प्रथा काही मोजक्याच घरात करण्यात येते. शहरात पाच दिवस, सात दिवस, 11 दिवसांचे गणपती मोठय़ा प्रमाणात पूजवितात. गुरुवारी दीड दिवसाच्या गणपतीचे विधिपूर्वक विसर्जन करण्यात आले. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे विसर्जन करण्यासाठी आलेल्या भाविकांची अडचण झाली. सायंकाळपर्यंत विसर्जन सुरू होते.