कंत्राटी स्वच्छता कामगारांच्या आंदोलनामुळे सर्वत्र अस्वच्छता : बाजारपेठेसह उपनगरांतील कचऱयाची उचल ठप्प झाल्याने दुर्गंधी
प्रतिनिधी /बेळगाव
हंगामी स्वच्छता कामगारांना सेवेत कायम करावे, या मागणीसाठी शुक्रवारी राज्यव्यापी कामबंद आंदोलन छेडले होते. त्यामुळे बाजारपेठेसह उपनगरातील कचऱयाची उचल ठप्प झाली होती. घरोघरी जावून कचऱयाची उचल करण्यात आली नसल्याने रस्त्यांशेजारी कचरा टाकण्यात आल्याने सर्वत्र कचऱयाचे ढिगारे साचले होते. काही ठिकाणी कचराकुंडीजवळ रस्त्यावर कचरा पसरून दुर्गंधी निर्माण झाली होती.
शहरातील स्वच्छतेचे काम कंत्राट पद्धतीने केले जाते. बेळगाव महापालिकेत एक हजारांहून अधिक स्वच्छता कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. स्वच्छता कामगारांना सेवेत कायम करावे, या मागणीसाठी अनेकवेळा निवेदन देण्यात आले होते. मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे स्वच्छता कामगार संघटनांनी शुक्रवारी राज्यव्यापी कामबंद आंदोलन छेडले होते. या आंदोलनात स्वच्छता कामगार सहभागी झाल्याने शहर आणि उपनगरातील कचऱयाची उचल झाली नाही. घरोघरी जावून कचऱयाची उचल करण्यात येते. पण कामबंद आंदोलनामुळे घरातील कचऱयाची उचल करण्यात आली नाही. त्यामुळे कचरा कुजण्याचा धोका असल्याने तसेच रोगराईस प्रारंभ झाल्याने काही ठिकाणी घरातील कचरा रस्त्याशेजारी टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले होते.
महापालिकेच्या ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी कचरा साचला होता. शहरातील बाजारपेठेतील कचऱयाची उचल दिवसातून दोनवेळा केली जाते. मात्र शुक्रवारी सकाळी कचऱयाची उचल झाली नसल्याने गणपत गल्लीतील मुख्य रस्त्यावर कचऱयाचे ढिगारे साचून दुर्गंधी पसरली होती. नरगुंदकर भावे चौक आणि कांदा मार्केट अशा दोन ठिकाणी भाजी मंडई आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात कचरा साचतो. दररोज दिवसभरात दोन टिप्परहून अधिक कचरा साचलेला असतो. पण या कचऱयाची उचल झाली नसल्याने नरगुंदकर भावे चौकात कचरा पसरला होता. तसेच ठिकठिकाणी कचऱयाचे ढिगारे साचले होते. काही ठिकाणी भटक्मया कुत्र्यांनी खाद्य शोधण्याचा प्रयत्न केल्याने कचरा रस्त्यावर पसरला होता. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱयाचे ढिगारे आणि दुर्गंधी पसरल्याचे चित्र दिसत होते.