नागरिक भयभीत : बुधवारी गवीरेडय़ांचा गावात प्रवेश झाल्याने तारांबळ
किणये : देसूर गावात चक्क दोन गवीरेडे दिवसाढवळय़ा दाखल झाले. गल्लीत अचानक फिरणारे गवीरेडे पाहून नागरिक भयभीत झाले. बुधवारी सकाळी 8ः30 च्या दरम्यान पोटे गल्ली व पाटील गल्लीत या गवीरेडय़ांनी बिनधास्तपणे संचार केला. यामुळे गावात सर्वत्र एकच खळबळ उडाली. गवी रेडय़ांचा वावर आता लोक वस्तीकडे वळू लागल्याचे चित्र पहावयास मिळू लागले आहे. काटगाळी डोंगर परिसरातून सदर गवीरेडे आले असावेत अशी माहिती देसूर ग्रामस्थांनी दिली आहे. बुधवारी सकाळी दोन मोठे गवीरेडे बिनधास्तपणे संचार करू लागले. हे पाहून महिलांनी बरीच आरडाओरडा केला. लहान बालके तर भयभीत झाली होती. एकंदर गावकऱयांनाही काय करावे हे सूचनासे झाले होते. मात्र, गावात 15 ते 20 मिनिटे फेरफटका मान सदर गवीरेडे शेतवाडीकडे गेले.
बेळवट्टी, बाकनूर, बडस, किणये या परिसरात नेहमीच गवीरेडे धुमाकूळ घालत असतात. शिवारातील पिकांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान करतात. यामुळे या भागातील शेतकरी गवी रेडय़ापासून अक्षरशः वैतागून गेलेला असतानाच आता देसूर परिसरात गवीरेडी दाखल झाल्यामुळे त्या भागात शेतकऱयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अन्न-पाण्याच्या शोधात आल्या संशय काटगाळी डोंगर भागातून सदर गवीरेडे मंगळवारी रात्रीच देसूरजवळ आले असावेत आणि बुधवारी नागरिकांच्या निदर्शनास आले. अन्न व पाण्याच्या शोधात सदर गवीरेडे आले असावेत असा संशय ही नागरिक व्यक्त करू लागले आहेत. वन्य प्राण्यांनी आता आपला मोर्चा नागरी वस्तीकडे वळविल्यामुळे शेतकऱयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरू लागले आहे.
बंदोबस्त करण्यी मागणी
ते गवे रेल्वेलाईन, सुळगे जवळील शिवारात ते निघून गेले असल्याची माहिती शेतकऱयांनी दिली. सध्या शिवारात कडधान्य, जोंधळा व अन्य पिके आहेत. त्यामुळे या गवीरेडय़ांचा वन खात्याच्या अधिकाऱयांनी बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे