जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : भटक्या विमुक्त समाजातील लोकांसाठी सी. एस. द्वारकानाथ यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांना विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडावे, अशा आशयाचे निवेदन भटके विमुक्त महासभेच्यावतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही वंटमुरी कॉलनीत राहतो. भटक्या विमुक्त समाजाच्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी द्वारकानाथ यांनी प्रयत्न केले आहेत. बालविवाह रोखणे, भीक मागणे थांबविणे, या शिवाय समाजातील अन्य अनेक अनिष्ठ प्रथा बंद व्हाव्यात, यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांना सदस्यत्व मिळावे, अशी मागणी या समाजाने केली आहे.