अपघाताचे प्रमाण आणखी वाढण्याच्या मार्गावर
गौरी आवळे/ सातारा
रस्त्यांवर अपघात झाला नाही. असा एकही दिवस जात नाही. दररोज मोठय़ा संख्येने रस्त्यावर येणारी वाहने अपघातांना कारणीभूत असली तरी, मानवी चुका हे प्रमुख कारण आहे. याच पार्श्वभूमीवर आता उन्हाळा सुरू झाला आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा संपून सुट्टया सुरू होणार आहेत. यामुळे अनेक जण फिरायला जाण्याचे नियोजन करतात. यावेळी प्रवासादरम्यान, नियमांचे पालन न केल्याने अपघात होऊन प्रसंगी जीव जावू शकतो. गतवर्षी 944 अपघाताची नोंद जिह्यात झाली आहे. यामुळे फिरायला जा, पण लाख मोलाचा जीव सांभळा असे म्हणण्याची वेळ आली आहे.
सातारा जिल्हा हा पर्यटकांच्या आकर्षणाचा पेंद्रबिंदू आहे. कास, ठोसेघर, यवतेश्वर, महाबळेश्वर, प्रतापगड अशी अनेक ठिकाणी पर्यटकांना नेहमी खुणावत असतात. जिह्यात बारा महिने पर्यटकांचा ओघ कायम असतो. परंतु उन्हाळ्यात पर्यटक फिरण्याचा आनंद जास्त घेत असतात. नुकत्याच बारावीच्या परीक्षा संपल्या असून आता दहावीच्या परीक्षाही संपण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे टेशन फ्रि होऊन आपल्या मुलासोबत फिरायला जाण्याचे अनेकांनी नियोजन केले आहे. आपल्या खाजगी वाहनांने प्रवास करणे अनेकांना सोयीचे वाटते. परंतु प्रवासादरम्यान, काळजी घ्या असे सांगण्याचे वेळ आली आहे. कारण गतवर्षी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने जिह्यात घडलेल्या अपघाताची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली. यादरम्यान, एकून 944 अपघात झाले आहेत. या अपघात जानेवारी 2022 व जानेवारी 2023 ची तुलना करता मृत्यूमुखी पडणाऱयांची संख्या 84 आहे. रस्त्यांचा विचार करता सर्वाधिक अपघात हे राष्ट्रीय मार्ग, त्यांनतर इतर रस्ते व सर्वात कमी अपघात राज्य महार्गावर दिसून येतात.
अपघातामध्ये समाविष्ट वाहनाचा विचार करता–
50 टक्के अपघातामध्ये दुचाकीचा समावेश आहे. 26 टक्के अपघातामध्ये चारचाकीचा तर 74.4 टक्के अपघातामध्ये अवजड वाहने व इतरचा समावेश होतो.
वेळेनुसार अपघाताचा विचार करता–
सर्वाधिक 55 टक्के अपघात दिवसावेळी घडल्याचे दिसून येते. त्यानंतर 31 टक्के अपघात रात्रीच्या वेळी घडल्याचे दिसून येते. सर्वात कमी 24 टक्के अपघात पहाटेच्या वेळी घडल्याचे दिसून येते.
प्राणांतिक अपघात व त्याव्यक्तिरिक्त अपघात यांची तुलना करता–
प्राणांतिक अपघात हे 51 टक्के तर त्या व्यतिरिक्त अपघात हे 49 टक्के आढळून येतात. शहरी भागात 25.6 टक्के अपघात झाल्याचे दिसून येते तर ग्रामीण भागामध्ये 74.4 टक्के अपघात घडल्याचे दिसून येते.
पादचारी व सायकलस्वार यांच्या अपघाताचे प्रमाणाचा विचार करता–
95 अपघातामध्ये पादचारी यांचा समावेश यांच्या समावेश आहे. तर 19 अपघातामध्ये सायकलस्वार यांचा समावेश होतो. एकून अपघाताच्या जवळपास 20 टक्के अपघातामध्ये पादचारी व सायकलस्वार यांचा समावेश होतो.