80 एकर जमिनीच्या रक्षणासाठी गावकऱयांचे गाऱहाणे
प्रतिनिधी /बेळगाव
पिरनवाडी परिसरातील 80 एकर जमीन वाचविण्यासाठी मजगाव ग्रामस्थांनी देवाला साकडे घातले आहे. सोमवारी मजगावचे ग्रामदैवत ब्रह्मदेव व कलमेश्वराला साकडे घालण्यात आले. जनावरांच्या चाऱयासाठीच्या जमिनीची विक्री करण्याचा घाट सुरू असून त्याला गावकऱयांनी विरोध केला आहे.
‘जनावरांच्या चाऱयाची जमीन हडप करणाऱयांना बघून घे रे देवा’, असे गाऱहाणे घातले असून शंभर वर्षांपूर्वी चाऱयासाठी गावकऱयांकडून एकत्रितपणे घेतलेल्या जमिनीची परस्पर विक्री करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गावातील चार प्रमुखांच्या नावे ही जमीन घेण्यात आली होती. ज्यांच्या नावे जमीन खरेदी करण्यात आली होती, त्या प्रमुखांच्या निधनानंतर शेतकऱयांचे हित धोक्मयात घालून ही जमीन विकण्याचा घाट घालण्यात आला आहे. गुरुवारी व्यवहार होणार आहे, अशी माहिती स्थानिक शेतकऱयांना मिळाल्यानंतर ‘चाऱयासाठीच्या जमिनीचा व्यवहार करणाऱयांना बघून घे रे देवा!’ असे गाऱहाणे घालण्यात आले आहे.
गाऱहाणे घालण्यापूर्वी संबंधितांशी चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. यातील काही जणांनी आमच्या नावे गाऱहाणे घालू नका, शेतकरी ठरवतील तसा निर्णय घेऊ, असे सांगितले असले तरी चाऱयासाठीच्या जमिनीचा व्यवहार करण्यासाठी हालचाली सुरू असून हा व्यवहार थांबवला नाही तर कायदेशीर लढाईचा इशारा शेतकऱयांनी दिला आहे.
शेतकरी तरुणांना पोलिसांमार्फत धमक्या…
या व्यवहाराला विरोध करणाऱया काही शेतकरी तरुणांना पोलिसांमार्फत धमक्मया देण्यात येत आहेत. या व्यवहारात पडू नका, नहून तुमच्यावर खटले घालू, असे बेळगाव ग्रामीण पोलिसांनी शेतकऱयांना धमकावल्याची माहिती मिळाली आहे. गावातील वार्ताफलकावर मजकूर लिहून गाऱहाणे घालण्यात आले असून चाऱयासाठीची जमीन वाचविण्यासाठी शेतकरी एकत्रित आले आहेत.