नवी दिल्ली : 220 अधिक चोरल्या गेलेल्या कलाकृती भारतात आणण्यास मागील 8 वर्षांमध्ये यश मिळाल्याची माहिती संस्कृती मंत्रालयाने मंगळवारी दिली आहे. संस्कृती मंत्रालयाने ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. 1947 पासून 2014 पर्यंत चोरीला गेलेल्या केवळ 13 कलाकृती प्राप्त करण्यात आल्या होत्या. याच्या उलट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 2014 नंतर अशाप्रकारच्या 220 अधिक कलाकृती पुन्हा मिळविण्यात आल्या आहेत, असे संस्कृती मंत्रालयाने नमूद केले आहे. याचबरोबर एक पोस्टर शेअर करण्यात आले असून त्याला ‘आमचा वारसा घरी आणणे (ब्रिंगिंग अवर हेरिटेज होम)’ असे शीर्षक देण्यात आले आहे. भारतातून चोरल्या गेलेल्या 228 कलाकृती 2014 पासून परत मिळविण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.
Previous Articleमहाराष्ट्राने दिल्लीला 191 धावांवर रोखले
Next Article ऑस्ट्रेलियात गोळीबार, 2 पोलीस अधिकाऱ्यांसह 6 ठार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.