मुंबई : ज्येष्ठ नेते व कॉम्रेड गोविंद पानसरे (Govind Pansare) मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांची हत्या करणाऱ्य़ांची चौकशी आता दहशतवादविरोधी पथकाकडे (ATS) सोपवावी अशी त्यांच्या कुटुंबाने विनंती केली आहे. पानसरे कुटुंबीयांचे वकील अभय नेवगी यांनी हा विनंती अर्ज कोर्टात दाखल केला आहे. न्यायालयाने याबाबत राज्य सरकारचे म्हणणे काय आहे ते मांडण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा- नव्या सरकारच्या खातेवाटपात महत्त्वाची खाती भाजपकडेचं?
न्यायमूर्ती रेवती ढेरे आणि न्यायमूर्ती व्हीजी बिष्ट यांच्या खंडपीठा पुढे हा अर्ज सादर करण्यात आला आहे. नरेंद्र दाभोलकर, एम. एम.कलबुर्गी, गौरी लंकेश आणि पानसरे यांच्या हत्येमागे मोठा कट आहे. त्याचा तपास योग्यप्रकारे होणे गरजेचे आहे, असे गोविंद पानसरे (Govind Pansare) यांच्या वकिलांनी अर्जात म्हटले आहे. दुसरीकडे पानसरे हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांनी बदलीसाठी न्यायालयाची परवानगी मागितली आहे.
Previous Articleनव्या सरकारच्या खातेवाटपात महत्त्वाची खाती भाजपकडेचं?
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.