तालुका म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय : आता न्यायालयीन लढाई तीव्र : प्रत्येक गावात करणार जागृती
प्रतिनिधी /बेळगाव
रिंगरोडमध्ये शेतकऱयांच्या सुपिक जमिनी जात असल्यामुळे आता त्याविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय तालुका म. ए. समितीच्या बैठकीत घेण्यात आला असून 28 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी, जनावरे आणि चाबूक यासह मोर्चा काढण्याचा निर्धार शेतकऱयांनी केला आहे.
रिंगरोडमध्ये तालुक्मयातील 31 गावांच्या जमिनी जात आहेत. या जमिनी तिबारपिकी आहेत. त्यामुळे त्याविरोधात आता लढा लढण्यासाठी रविवारी तालुका म. ए. समितीच्यावतीने गोवावेसजवळील ओरिएंटल स्कूलच्या तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे बैठक घेण्यात आली. त्यामध्ये सर्वच शेतकऱयांनी हा निर्धार केला आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते.
या बैठकीला मोठय़ा संख्येने शेतकरी उपस्थित होते. यावेळी ऍड. एम. जी. पाटील, ऍड. श्याम पाटील, ऍड. सुधीर चव्हाण, ऍड. प्रसाद सडेकर, माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, मनोज पावशे, एस. एल. चौगुले, संतोष, पुंडलिक यांनी आपले विचार व्यक्त केले. माजी महापौर शिवाजी सुंठकर म्हणाले, शेतकऱयांच्या सुपिक जमिनी कोणत्याही परिस्थितीत घेऊ देणार नाही. त्यासाठी सर्वच शेतकऱयांनी आता हरकती नोंदविल्या आहेत. न्यायालयीन लढा लढण्याबरोबरच रस्त्यावरील लढाई लढणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी शेतकऱयांनी एकजुटीने या लढाईमध्ये सहभागी व्हावे आणि सरकारचा हा डाव हाणून पाडावा, असे आवाहन केले.
शेतकऱयांनी हरकती नोंदविल्याबद्दल त्यांचे बैठकीत अभिनंदन करण्यात आले. याचबरोबर ऍड. एम. जी. पाटील, ऍड. श्याम पाटील, ऍड. सुधीर चव्हाण आणि ऍड. प्रसाद सडेकर यांनी शेतकऱयांच्या सर्व हरकती घेऊन त्या कायदेशिररित्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे नोंदवून घेतल्या. त्याबद्दल या सर्व वकिलांचेदेखील अभिनंदन करण्यात आले.
आता प्रत्येक गावात मोर्चासंदर्भात जागृती
सोमवार दि. 28 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्चाची जनजागृती तालुक्मयातील प्रत्येक गावामध्ये करण्याचे ठरविण्यात आले आहे. या मोर्चामध्ये जमीन जाणाऱया शेतकऱयांसह इतर शेतकऱयांनीही उपस्थित राहून तीव्र विरोध करायचा आहे. त्याबाबत प्रत्येक गावात जनजागृती केली जाणार आहे.