राधानगरी / महेश तिरवडे
महावितरणने प्रस्तावित केलेला वीज दरवाढीचा प्रस्ताव पूर्णपणे रद्द करावा,राज्यातील वीजदर कमी करून ते इतर राज्यांच्या तुलनेत आणावेत, महाराष्ट्रराज्य हे वीज दरवाढीत पहिल्या क्रमांकावर असल्याचा निषेध करत वीज बिलाची होळी करून राधानगरी तालुका जनता दलाच्या वतीने मोर्चाने महावितरणचे राधानगरी उपअभियंता गिरीष भोसले व नायब तहसीलदार राधानगरी यांना निवेदन देण्यात आले.
राधानगरी बस स्थानकापासून मोर्चा काढत महावितरणच्या कार्यालयासमोर कोल्हापूर जिल्हा राधानगरी तालुकाजनता दलाच्या वतीने वाढीव वीज बिलाची होळी करण्यात आली.यावेळी भाजप सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला, महाराष्ट्र राज्यामध्ये देशात सर्वाधिक वीज दर असल्याचे स्पष्ट करत गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रातील वीजदर लागू करावेत महाराष्ट्रात सर्वाधिक वीजदर असल्यामुळे उद्योग व्यवसाय महाराष्ट्र बाहेर जात असल्यामुळे राज्य सरकारने वेळीच जागे होऊन दरवाढ कमी करावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा जनता दलाचे अध्यक्ष वसंतराव पाटील यांनी केली. या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार व उपकार्यकारी अभियंता गिरीष भोसले यांना देण्यात आले.
या आंदोलनात जिल्हा अध्यक्ष वसंतराव पाटील,राज्य महासचिव शिवाजीराव परुळेकर, शहर जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील,तालुका अध्यक्ष विठ्ठल मुसळे,शरद पाडळकर,बबन पाटील,शुभम पाटील,सर्जेराव बुगडे,प्रकाश पाटील, आंनदा वागरे, साताप्पा सुतार,, सचिन बुटके यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.