ऑनलाईन टीम/तरुण भारत
गुजरातमधील (Gujarat) अरवली जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी मोठा अपघात झालाय. भरधाव कारने पायी जाणाऱ्या भाविकांना धडक दिली. ज्यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. ज्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले बहुतांश पंचमहालचे रहिवासी असल्याचे समजत आहे. भरधाव वेगातील कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
अरवली कृष्णापूरजवळ हा अपघात (accident) झाला आहे. अपघातनंतर जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान अपघातातील मृत व्यक्तींची ओळख पटवली जात असून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अपघातातील बहुतांश प्रवासी हे पंचमहाल जिल्ह्यातील काकोळ येथील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. हे सर्व प्रवासी अंबाजी मंदिरात (ambaji mataji temple) दर्शनासाठी पायी चालत निघाले होते. यावेळी एका भरधाव काराने या लोकांना चिरडल्याची घटना घडली, हा अपघात नेमका कसा झाला याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. ही कार महाराष्ट्र पासिंग असल्याची माहिती मिळाली आहे. पण, ती कोणाची आहे, याबाबत अद्याप कुठलाही माहिती नाही. या अपघातात कारचेही मोठे नुकसान झाले आहे.