ऑनलाईन टीम/तरुण भारत
गुजरातमध्ये पुन्हा एकदा तब्ब्ल २५० कोटींचं ड्रग्ज पोलिसांनी जप्त केलं आहे. गुजरातच्या (Gujrat) कच्छ जिल्ह्यातील सागरी किनारी भागात गुजरात एटीएसने ही कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. गुजरात एटीएसने (ATS) सोमवारी यासंदर्भात माहिती दिली. सीमा सुरक्षा दल (Border Security Force) आणि पोलिसांनी रविवारी जखाऊजवळ ४९ बॅग्ज जप्त केल्या होत्या. त्यामुळे हे हेरॉईन (heroin) पाकिस्तान (pakistan) तस्करांकडून फेकण्यात आल्याचं कनेक्शन एटीएसने स्पष्ट केलं आहे.
एटीएसने ४९ बॅग हस्तगत केल्या आहेत. यामध्ये सुमारे ५० किलो हेरॉईन सापडलं आहे. या प्रत्येक पॅकेटचं वजन जवळपास १ किलो आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील या हेरॉईनची किंमत सुमारे २५० कोटी रुपये असल्याची माहिती गुजरात एटीएसचे पोलीस उपअधीक्षक बी. पी. रोझिया (b p roziya) यांनी दिली आहे. आठवड्याभरापूर्वीच मिठाण्या गोण्यांमधून ड्रग्जची वाहतूक करण्यात आल्याचं समोर आलं होतं. मात्र या प्रकरणी बंदरामध्ये कारवाई करण्यात आली आहे.
३० मे रोजी तटरक्षक दल आणि एटीएसने या अगोदर भारतीय सीमेअंतर्गत सात पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली होती. तर गुजरातमध्ये अंमली पदार्थांची तस्करीच्या योजना आखणाऱ्या तस्करासंबंधित मि्ळालेल्या सुचेनवरून बोटीचा कॅप्टन मोहम्मद अक्रम याने तटरक्षक दलाचे जहाज जवळ येताच दोन पिशव्या समुद्रात फेकून दिल्या होत्या, अशी माहिती गुजरात एटीएसचे पोलीस उपअधीक्षक बी. पी. रोझिया यांनी दिली.