ऑनलाईन टिम : मुंबई
शिवसेनेत राजकीय, आणि संघटनात्मक संघर्ष चालू आहे. शिवसेनाप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्य़मंत्री उध्दव ठाकरे या य़ांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना परत येण्याची साद घालूनही काही आमदार शिंदे गटात सामिल झाले आहेत. त्यामुळे आजच्या राजकीय घडामोडीत ही एक मोठी घटना मानली जात आहे
काल पासूनच्या राजकिय घडामोडीमंतर अखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली. या संदेशात त्यांनी बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन केले. पण या शिवसेना प्रमुखांच्या या आवाहनानंतरही उरलेले आमदरही शिंदे गटाकडे गेलेले दिसून येत आहे. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह चंद्रकांत पाटील, योगेश कदम, मंजुळा गावित हे तीन आमदार शिंदे गटाच्या गळाला लागले असून हा शिवसेनेला आजचा मोठा धक्का मानला जातो.
गुलाबराव पाटील यांच्याबरोबरच चंद्रकांत पाटील, योगेश कदम, मंजुळा गावित हे गुवाहटीच्या हॉटेलमध्य़े पोहोचल्यावर या चारही आमदारांच इतर आमदारांनी स्वागत केलं. हॉटेलमध्ये सर्व आमदारांनी एकनाथ शिंदे यांची विषेश भेट घेतली.