राणी रामपाल, नवनीत आणि नवज्योत ही तीन नावे भारतातल्या प्रत्येक हॉकीप्रेमींना माहिती असतात हे सत्य आहे. राणी रामपाल यांनी तर भारतीय महिला हॉकी संघाचे कप्तानपद भूषविले आहे. या तिन्ही महिला खेळाडूंच्या यशाचे श्रेय त्यांचे गुरु बलदेव सिंग यांना जाते. बलदेव सिंग स्वतः त्यांच्या तारुण्यात उत्कृष्ठ हॉकीपटू होते. आता त्यांनी हॉकीचे गुरुत्त्व स्वीकारले आहे.
वर उल्लेख केलेल्या तिन्ही महिला हॉकीपटूंना हॉकीची स्टीक कशी धरायची येतपासूनचे प्रशिक्षण बलदेव सिंग यांनी दिले आहे. त्याच जोरावर आज या तिन्ही महिला हॉकी खेळाडू महिला हॉकी क्षेत्रात भारताचे नाव गाजवत आहेत. हॉकी स्टीक पकडण्याची विशिष्ट शैली हे बलदेव सिंग यांचे वैशिष्टय़ आहे. या ग्रिपमुळे खेळाडूंच्या हालचाली वेगवान होतात. आणि त्यामुळे ते खेळाडू इतरांच्या तुलनेत अधिक यशस्वी ठरतात. नवनीत यांनी तर असे म्हटले आहे की केवळ बलदेव सिंग हे गुरु लाभले म्हणूनच आपण हॉकी क्षेत्रात नाव मिळविले आहे. अन्यथा हॉकीकडे आपण वळण्याचीही शक्यता नव्हती. नवज्योत यांनी पाचव्या इयत्तेपासून कोच बलदेव सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हॉकी खेळण्यास प्रारंभ केला. आज या तिन्ही खेळाडू त्यांच्या यशाच्या चरण सीमेवर आहेत. त्यांची नावे सर्वांना माहित आहेत. तथापि या तिन्ही महिला हॉकी खेळाडू आपल्या यशाचे सर्व श्रेय प्रशिक्षक बलदेव सिंग यांना देतात. गुरु पौर्णिमेच्या दिवशी जगप्रसिद्ध शिष्यांनी गुरुला दिलेली यापेक्षा अधिक मानवंदना दुसरी कोणती असू शकत नाही.