बातमीदार /खानापूर
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र खानापूर येथे गुरुपौर्णिमा भक्तीभावाने साजरी करण्यात आली. सकाळी 6 वाजता क्षेत्रशिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी दांपत्यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांची षोडशोपचार पूजा करण्यात आली. त्यानंतर 8 वाजता आरती सर्व स्वामी सेवेकऱयांना गुरुदीक्षा देण्यात आली. सकाळी 10.30 च्या महानैवेद्य आरती व स्वामी चरित्र सारामृत पाठाचे वाचन करण्यात आले. सायंकाळी 3 वाजता खानापूर महिला भजनी मंडळातर्फे भजनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. व सायंकाळी 6 च्या महानैवैद्य आरतीनंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी स्वामी समर्थ केंद्राचे सर्व सेवेकरी, भक्तमंडळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.