लक्ष घालण्याची सूचना : रस्ताकाम होणार का बंद?
प्रतिनिधी /बेळगाव
हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम बेकायदेशीररित्या सुरू आहे. न्यायालयात खटला प्रलंबित असताना दडपशाही करत काम सुरू असल्यामुळे शेतकरी मोनाप्पा बाळेकुंद्री यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. त्याची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली असून राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून याकडे लक्ष घालण्याची सूचना केली आहे. याबाबत शेतकरी मोनाप्पा बाळेकुंद्री यांनाही पत्राची प्रत पाठविली आहे. आता राज्याचे सचिव तरी याकडे लक्ष देणार का? असा प्रश्न साऱयांनाच पडला आहे.
हलगा-मच्छे बायपास रस्त्याला शेतकऱयांनी विरोध केला. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दडपशाही करत काम सुरूच ठेवले आहे. न्यायालयाने स्थगिती दिली असतानाही हे काम सुरू ठेवले आहे. एकप्रकारे हा न्यायालयाचा अवमान आहे. जिल्हा प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासमोर शेतकरी हताश झाला आहे. कर्नाटकात लोकशाही आहे की नाही? असा प्रश्न शेतकऱयांना पडला आहे. आपणाकडे कोणीच लक्ष देत नसल्याचे पाहून त्यांनी पंतप्रधानांना पत्र पाठविले.
या पत्रातून होणारी दडपशाही आणि बेकायदेशीर कामांची माहिती पाठवून दिली होती. या पत्रावर मोनाप्पा बाळेकुंद्री यांच्यासह मनोहर कंग्राळकर, तानाजी हलगेकर, हणमंत बाळेकुंद्री, गोपाळ सोमनाचे, नागेंद्र मऱयाकाचे यांच्याही स्वाक्षऱया आहेत. सध्या हलगा-मच्छे बायपासचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. न्यायालयाने स्थगिती देऊनही हे काम सुरू आहे. यामुळे शेतकऱयांना काहीच करता येत नसल्याचे दिसून येत आहे.
शेतकऱयांना वेठीस धरण्याचा प्रकार
कायमस्वरूपी या कामाला स्थगिती दिली होती. तरीदेखील हे काम करण्यात येत असल्यामुळे शेतकऱयांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. काही दिवस काम बंद करायचे व काही दिवस सुरू करायचे, असा प्रकार केला जात आहे. एकप्रकारे शेतकऱयांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून या पत्राची दखल घेतली असून राज्याच्या सचिवांना पत्र आले असून ते आता हे काम थांबविणार आहेत का? याकडे पहावे लागणार आहे.