वार्ताहर /हरमल
बालरथाच्या बाबतीत सरकारने योग्य पावले उचलताना खडबडून जागे न होता, अनर्थ होईपर्यंत वाट पाहू नये, त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन हरमल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केले. बालरथाच्या स्थितीबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर चेअरमन पार्सेकर बोलत होते. सरकारने याबाबत प्राधान्याने पावले उचलावीत किंवा तालुकास्तरावर आवश्यक आर्थिक साहाय्य दिले पाहिजे. कित्येक बालरथांची स्थिती दयनीय बनली आहे, त्यांच्याजागी नवीन रथ येणे आवश्यक आहे. पंचक्रोशी संस्थेचे हायस्कूल व हायर सेकंडरीच्या मिळून चार बसेस तसेच दोन खाजगी बसेस भाडेपट्टीवर आहेत. सात वर्षानंतर नवीन बालरथ देण्याचा नियम आहे, तसा प्रस्ताव शिक्षण खात्याकडे पाठवला आहे, मात्र बसेस नसल्याचे उत्तरात कळवले आहे.
सरकारकडून डिझेल, वाहक, चालकांचा पगार दिला जातो, त्यापलिकडे, पंचक्रोशी संस्था, प्रत्येक रथावर किमान एक लाख ऊपये देखभालीसाठी खर्च करते. सरकारला नाकापेक्षा मोती जड प्रकार असल्यास, संस्था खरेदी करत असल्यास संस्थेसाठी भरीव तरतूद केली पाहिजे. एखादी बस नादुऊस्त झाल्यास आमच्याकडील अन्य बस पाठवून विद्यार्थ्यांना घरी सोडले जाते, असे चेअरमन पार्सेकर यांनी सांगितले. अलिकडे मे महिन्याच्या सुट्टीत, संस्थेच्या सर्व बालरथांची दुऊस्ती केली जाते. त्यामुळे जून महिन्यात मुलांना कष्ट पडणार नाही याची दक्षता घेतली जाते. बालरथाचे अंतर्गत फ्लोअर आम्ही बदलले असून मुलांना इजा होण्याची भीती होती. कित्येक बसेसची दुर्दशा झालेली पहावयास मिळते, अनर्थ घडू नये अशी अपेक्षा आहे. सरकारने नवीन बालरथ देण्यासाठी एकतर अंदाजपत्रकात जादा तरतूद केली पाहिजे किंवा त्यांच्या दुऊस्तीसाठी आर्थिक साहाय्य दिले पाहिजे, असे लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले.