पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील ब्राम्हण संघटनांना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. आज पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय इथे सायंकाळी हि बैठक होणार आहे. त्यावरून माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार याना खोचक टोला लगावला आहे. ब्राम्हण समाजाची आठवण पवार यांना झाली हि आनंदाची बाब आहे. असे फडणवीस म्हणाले आहेत.
फडणवीस पुढे म्हणाले आहेत, ”पवार साहेबांना ब्राह्मण समाजाची आठवण झाली ते बरं झालं, आनंद आहे. इतक्या वर्षांनी पवार साहेबांना ब्राम्हणांची आठवण आली आहे. असा टोला लगावत, सर्वांना बैठक बोलवण्याचा अधिकार आहे व कोणत्याही समाजाची बैठक बोलवण्याचा अधिकार आहे.” असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या नेत्याकडून ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे समजत होणारी दुफळी टाळण्यासाठी किंवा राष्ट्रवादीवरचा रोष कमी करण्यासाठी हि बैठक होत असल्याची चर्चा आहे. तर राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्यामुळे दूषित झालेले वातावरण निवळून पुढील राजकारणाची साखरपेरणी करण्याच्या हालचाली सुरु असल्याचे बोलले जात आहे.