पणजी : गोव्याचे राज्यपाल श्री पीएस श्रीधरन पिल्लई यांनी गोमंतकीयांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. गणेश चतुर्थी हा आपल्या देशातील एक महत्त्वाचा सण असून धर्म, जात, पात बाजूला सारून सर्व नागरिक मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने हा सण साजरा करतात. श्री गणेश हे हिंदू देवतातील सर्वात पूज्य देवतांपैकी एक असून त्याना विघ्नेश्वर म्हणूनही ओळखले जाते. श्रीगणेश ‘विघ्नहर्ता’ म्हणजे सर्व अडचणी दूर करणारा आणि यश आणि समृध्दीचे दैवत आहे, असे राज्यपाल संदेशात म्हणतात ,गणेश चतुर्थीचा उत्सव संपूर्ण देशभरात आनंदाची उधळण करतो आणि सामाजिक सलोखा आणि परस्पर सामंजस्याने लोकांना एकत्र आणतो. या शुभ प्रसंगी, भगवान गणेश सर्वांना शांतता, आनंद आणि समृद्धी घेऊन येवो असे राज्यपाल आपल्या संदेशात म्हणतात.
Previous Articleमुख्यमंत्र्यांकडूनही गोमंतकीयांना शुभेच्छा
Next Article गणरायाचे जल्लोषात आगमन
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.