पणजी ; राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी गोमंतकीय जनतेला रामनवमीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, रामनवमी हा एक हिंदू सण आहे, ज्यादिवशी भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या श्रीरामाचा जन्म साजरा केला जातो. राम नवमी पृथ्वीवरील आध्यात्मिक शक्तीच्या आगमनाचे महत्त्व सांगते. रामनवमी साजरी करणे म्हणजे नकारात्मकता काढून टाकणे व धर्माची स्थापना करणे. भगवान राम म्हणजे करूणा, सौम्यता, दया, धार्मिकता व एकात्मता यांचे मूर्त स्वरूप आहे, ज्यांनी परिपूर्ण नैतिक व सामाजिक वर्तनाचे दर्शन घडविले. ते एक आदर्श पुत्र, आदर्श पती व एक आदर्श राजा होते. दुष्टतेवर चांगुलपणाने मिळविलेल्या विजयाचे ते प्रतीक आहेत. आपल्या नैतिक जबाबदाऱ्या मानवाने कशा पार पाडाव्यात याचे भगवान राम उत्तम उदाहरण आहेत. त्यांना मर्यादा पुऊषोत्तम असेही संबोधले जाते. अयोध्येतील त्यांचे राज्य रामराज्य असे संबोधले जायचे, जे उत्तम शासनाचे प्रतीक असून, अनुकरणीय आहे. भगवान राम हे विश्वासाचे प्रतीक आहेत. त्यांचे आदर्श व्यक्तिमत्त्व आपल्या आयुष्यात स्वार्थी हेतुंशिवाय पुढे जाण्यास प्रोत्साहन देते. रामनवमीचा हा सण यंदा सर्वांच्या आयुष्यात शांती, आनंद, सुख व समृद्धी घेऊन येवो, असे राज्यपालांनी संदेशात म्हटले आहे.
Previous Articleसर्वस्पर्शी अर्थसंकल्प
Next Article दूध उत्पादकांवर व्यवसाय बंद करण्याची वेळ आणू नका
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.