प्रतिनिधी/ पणजी
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी दसरा तथा विजयादशमीनिमित्त राज्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
दसरा विजयादशमीच्या उत्साहाने नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांच्या उत्सवाची सांगता होते. या सणाचा प्रत्येक प्रांतात आध्यात्मिक अर्थ वेगळा असला तरी वाईट प्रवृत्तांrवर मिळविलेला विजय अशी मूळ भावना आजही तशीच आहे. अशा उत्सवाने लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि देशाची एकता आणि अखंडता राखण्यात उल्लेखनीय भूमिका बजावली आहे, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
आज जेव्हा जग असहिष्णुता, द्वेष आणि हिंसेच्या दुष्टतेने ग्रासलेले असताना आपण सहिष्णुता, बंधुता आणि शांतता या महान मूल्यांप्रती वचनबद्ध होऊया. या वर्षीचा दसरा हा सण गोव्यातील जनतेला अधिक शांतता, आनंद आणि समृद्धी घेऊन येवो, असेही त्यांनी पुढे संदेशात म्हटले आहे.