जिल्हाधिकाऱयांनी बैठकीत केली अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
स्वातंत्र्यदिनानिमित्त ऑगस्ट महिन्यामध्ये सलग तीन दिवस ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रम मोहीम राबविली जाणार आहे. प्रत्येक घर, शासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या इमारतीवर हे ध्वज फडकविण्यात येणार आहेत. ऑगस्ट 13 पासून 15 पर्यंत हे ध्वज फडकविण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या मार्गसुचीनुसार ध्वज फडकविले जाणार आहेत. याबाबत अधिकाऱयांनी जनजागृती करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली. प्रत्येक संघटनेच्या इमारतीवर ध्वजारोहण करण्याबाबत त्यांनी सूचना केली. सोशल मीडिया तसेच इतर माध्यमातून प्रसार केला जाणार आहे. याचबरोबर बॅनर तसेच पत्रकेदेखील छपाई करून वितरण करावीत, अशी सूचना जिल्हाधिकाऱयांनी केली आहे.
सर्व शासकीय कर्मचारी, अंगणवाडी, आशा सेविकांनी या जनजागृतीमध्ये सामील होऊन जनतेला मार्गदर्शन करावे. भारत सरकारने ध्वजसंहितेमध्ये काही बदल केले आहेत. आता प्रत्येकाच्या घरावर ध्वज फडकविता येणार आहे. जिल्हय़ातील खेळाडू तसेच इतर नामांकित कलाकार व लेखकांच्या माध्यमातून जनजागृती करण्याबाबतही त्यांनी यावेळी सूचना केली.
तिरंगा ध्वजाचा पुरवठा होणार
शासनाने तिरंगा ध्वज पुरवठा करण्याबाबत सर्व ती तयारी केली आहे. संबंधित विभाग आणि शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत जनतेला ध्वज दिले जाणार आहेत. यासाठी 25 रुपये घेतले जाणार आहेत. संबंधित सर्व नागरिकांना ध्वज पोहोचविण्याची सूचना योग्य पद्धतीने आणि पारदर्शकतेने करा, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. बैठकीला जि. पं. सीईओ दर्शन एच. व्ही., पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी, अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी व इतर अधिकारी उपस्थित होते.