प्रतिनिधी /पणजी
पर्ये मतदारसंघाचे माजी आमदार प्रतापसिंह राणे यांनी आमदार म्हणून 50 वर्षे पूर्ण केलेली नाहीत, असा दावा ऍड. आयरीश रॉड्रिग्स यांनी मुंबई उच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्राद्वारे केला असून खोटय़ा माहितीवरून देण्यात आलेला आजीव कॅबिनेट दर्जा काढून घेण्यात यावा अशी मागणी केली आहे या याचिकेवरील सुनावणी येत्या 4 मे रोजी ठेवण्यात आली आहे.
प्रतापसिंह राणे यांना आजीवन कॅबिनेट दर्जा देऊन कॅबिनेट मंत्र्यांच्या सर्व सुविधा पुरवण्याचा निर्णय 7 जानेवारी 2022 रोजी मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यावेळी प्रतापसिह राणे यांनी आमदारकीची 50 वर्षे पूर्ण केली असल्याचे कॅबिनेट नोटमध्ये म्हटले होते. प्रत्यक्षात त्यांच्या आमदारकीला 50 वर्षे मार्च 2022 मध्ये पूर्ण होणार होती. पण फेब्रुवारीत निवडणुका आल्या त्यांचा आमदारकीचा कार्यकाळ 50 वर्षाला 1 महिना बाकी असनाना संपला.
50 वर्षे अधिकृतरित्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी यंदाची विधानसभा निवडणूक लढवणे आवश्यक होते असा दावा ऍड. आयरीश यांनी केला आहे.
असा दर्जा कोणाला देता येत नाही हे पद घटनबाहय़ आहे यापूर्वी गोवा सरकारने काही आमदारांना संसदीय सचिव हे काल्पनिक पद बहाल करून कॅबिनेट दर्जा दिला होता. ऍड. आयरीश यांनी तेव्हा उच्च न्यायालयात आव्हान देऊन स्थगिती मिळवली. न्यायपीठाने तेव्हा ती पदे घटनाबाहय़ा ठरवून रद्द केली होती. राणे यांना कॅबिनेट दर्जा देण्यात आल्याने त्यांच्या सेवेत 18 सरकारी कर्मचारी, सुरक्षेसाठी पोलीस, वाहने, पेट्रोल, टेलीफोन बील, घर भाडे आदी सुविदा देण्यात आल्या आहे.
राजकीय संन्यास घेतल्यानंतर त्यांची हलाक्याची परिस्थिती आहे असा सरकारचा दावा नाही. त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न म्हणून त्याना मदत म्हणून हा दर्जा देण्यात आलेला नाही. सर्व माजी आमदारांना पुरेसे निवृत्ती वेतन दिले जाते. करदात्यांवर भार टाकून हा बेगडी सम्मान प्रतापसिंह राणे यांनी स्विकारायला नको होता त्यांनी आपणहून सदर दर्जा नाकारला असता तर त्यांचा संम्मान वाढला असता त्यामुळे या याचिकेत प्रतिवादी असलेले प्रतापसिंह राणे 4 मे रोजी कोणते उत्तर सदार करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.