वनवेबचे उपग्रह लवकरच प्रक्षेपित केले जाणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
36 छोटे विदेशी उपग्रह अवकाशात प्रस्थापित करण्याचे अभियान यशस्वी झाल्यानंतर आता इस्रोने आपल्या अत्याधुनिक आणि सर्वात वजनदार अग्निबाणाच्या इंजिनाचे परीक्षण केले आहे. हे परीक्षण यशस्वी झाल्याचे इस्रोकडून प्रतिपादन करण्यात आले. हाय अल्टीटय़ूट परीक्षण केंद्रामध्ये या सीई-20 प्रकारच्या इंजिनाचे शनिवारी परीक्षण करण्यात आले होते.
इस्रोच्या आगामी काळातील एलव्हीएम-3-एम-3 अभियानासाठी या इंजिनाची चाचणी करण्यात आली. वनवेब ही ब्रिटनमधील कंपनी असून या कंपनीचे कांही उपग्रह पुढच्या वषीच्या प्रारंभी या अग्निबाणाच्या साहाय्याने प्रक्षेपित करण्यात येतील. इस्रोची उपकंपनी असणाऱया न्यूस्पेस इंडिया लि.च्या माध्यमातून हे उपग्रह अवकाशात सोडले जातील अशी शक्यता आहे. यासाठीची तयारी वेगाने केली जात आहे. इस्रोच्या म्हणण्यानुसार हे पाऊल भारताचे अवकाश क्षेत्रातील प्राबल्य सिद्ध करणारे असेल. भारत सरकारनेही इस्रोला या संबंधात सहकार्य केले आहे.
संपूर्ण भारतात कनेक्टीव्हीटी
संपूर्ण भारत इंटरनेटशी जोडला जाण्याचे ध्येय 2023 च्या अखेरीपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. केंद्र सरकारची ही महत्वाकांक्षी योजना इस्रोच्या सहकार्यानेच बनविण्यात आलेली आहे. लडाखपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून अरुणाचलपर्यंत प्रत्येक कानाकोपऱयात इंटरनेट सुविधा आणि सेवा पुरविण्याची तयारी सुरू करण्यात आली असून त्यासाठी इस्रोचे हे परीक्षण महत्त्वाचे आहे.
पाच देशांमध्ये समावेश
सर्वात जड अग्निबाणाचे यशस्वी परीक्षण केल्यामुळे भारत आता निवडक पाच देशांच्या पंक्तीत स्थानापन्न झाला आहे. अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन इत्यादी देशांकडेच केवळ हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. वनवेबचे उपग्रह उद्योग, शिक्षण आणि वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी उपयुक्त ठरतील असे तज्ञांचे मत आहे. त्याचप्रमाणे प्रशासकीय कामकाजाची गुणवत्ता सुधारण्यासाठीही या उपग्रहीय कनेक्टीव्हीटीचा उपयोग होणार आहे, अशी माहिती वनवेबकडून देण्यात आली.
648 उपग्रहांची साखळी होणार
वनवेबचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांच्या म्हणण्यानुसार पुढील वषी चार प्रक्षेपणे केली जाणार आहेत. त्यांच्या माध्यमातून अनेक उपग्रह अवकाशस्थ होणार असून पृथ्वीवरच्या अत्यंत खालच्या पातळीवरील कक्षेत 648 उपग्रहांची एक साखळी तयार केली जाणार आहे. यापैकी 70 टक्के उपग्रह येत्या 6 महिन्यात प्रक्षेपित केले जाणार आहेत. वास्तविक याचवषी ही प्रक्षेपणे केली जाणार होती. तथापि रशिया आणि युपेन यांच्यातील युद्धामुळे प्रक्षेपणे लांबविण्यात आली. युद्ध अद्यापही थांबलेले नसले तरी इस्रोला या प्रक्षेपणांचे अभियान फार काळ लांबविता येणार नाही. त्यामुळे येत्या 6 महिन्यात ते हाती घेतले जाणार आहे.
ध्येयपूर्तीसाठी अवघे एक वर्ष
2023 पर्यंत संपूर्ण भारत इंटरनेटशी जोडण्याचे ध्येय पाच वर्षांपूर्वीच निर्धारीत करण्यात आले होते. तथापि कोरोनाचा उदेक आणि नंतर रशिया -युपेन यांच्यातील युद्धामुळे सर्व कार्यक्रम पुढे ढकलावा लागला. आता युद्ध परिस्थिती सुधारलेली नसली तरी कोरोनाची स्थिती बऱयापैकी आटोक्मयात आलेली आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडे ध्येयपूर्तीसाठी अवघा 14 महिन्यांचा कालावधी शिल्लक उरला आहे. या कालावधीतच हे अभियान पूर्ण केले जाणार आहे.
महत्त्वाकांक्षी योजनेचा आरंभ
वनवेब कंपनीकडून अवकाशात उपग्रहांची मालिका तयार होणार
648 उपग्रहांच्या माध्यमातून संपूर्ण देशात इंटरनेट सेवा दिली जाणार