बेळगाव प्रतिनिधी –
गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या संततधार पावसानंतर रविवारी रात्रीपासून आणखीनच जोर झाला असून या पावसामुळे पुन्हा जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाला जोर वाढल्याने जिल्हाधिकार्यांनी तातडीने शाळांना सुट्टी जाहिर केली. मात्र शाळा असल्यामुळे विद्यार्क्षी शाळेकडे आले होते. त्यांना परतताना या पावसाचा मोठा त्रास सहन करावा लागला. या पावसामुळे अन्नपूर्णेनगर, केशवनगर परीसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरुन सार्यांचीच तारांबळ उडाली आहे.
या पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पाणी साचल्याने त्यामधून वाट काढताना सार्यांनाच कसरत करावी लागत होती. येळ्ळूर रस्त्यावरील केशवनगर, अन्नपूणनगर येथे रस्त्यावरच गुडघाभर पाणी साचून होते. त्यामधून वाहने चालविताना कसरत करावी लागत होती. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने सार्यांनाच मोठा त्रास सहन करावा लागला. संततधार पाऊस सुरू असल्याने सार्यांचीच तारांबळ उडताना दिसत होती.
Previous Articleआंतरक्लब जलतरण स्पर्धेला उत्साहात प्रारंभ
Next Article सत्ताधाऱयांनी बेरोजगारीचा प्रश्न सोडवावा