धरणातून १६०० क्यूसेकने विसर्ग सुरू
राधानगरी/प्रतिनिधी
पंधरा दिवसाच्या विश्रांती नंतर राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात व अभयारण्य क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. संतधार पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचा ओघही वाढला असून धरण ८० टक्के भरले आहे.
रविवारी सकाळी 8 वाजता पाणी पातळी ३३८.०३ इतकी आहे,धरणातून ६०० क्यूसेक वरून १६०० क्यूसेक विसर्ग वाढवल्याने पुन्हा भोगावती नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली आहे, सद्या पाणी साठा ६६६८.७३ द ल घ फूट (६.४९ टीएमसी) इतकी आहे. दिवसभरात १३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे, आतापर्यंत २४१३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.