पुन्हा जनजीवन विस्कळीत : अनेक ठिकाणी पाणी साचल्याने तारांबळ : ऐन गणेशोत्सवातच पावसाच्या हजेरीने नाराजी
प्रतिनिधी / बेळगाव
पावसाने गुरुवारीही शहरासह उपनगरांना झोडपले. बुधवारी सायंकाळी झालेल्या दमदार पावसानंतर गुरुवारीही पाऊस कोसळल्याने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले होते. गणेशोत्सवाच्या प्रारंभापासूनच पावसाने झोडपून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाविकांतून नाराजी व्यक्त होत आहे. गुरुवारी झालेल्या दमदार पावसामुळे काही भागांमध्ये पाणीच पाणी झाले तर काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
गुरुवारी दुपारी ढगांच्या गडगडाटासह पावसाचे आगमन झाले. प्रारंभी पावसाचा शिडकावा झाला. मात्र त्यानंतर दमदार पाऊस कोसळला. या पावसामुळे साऱयांचीच तारांबळ उडाली. बुधवारी तब्बल तीन तासहून अधिकवेळ पाऊस झाला. त्यानंतर गुरुवारीही पाऊस झाल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले. काही ठिकाणी पाणी साचून राहिले होते.
गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भव्य मंडपांची उभारणी केली आहे. मात्र या दमदार पावसामुळे काही मंडपांमध्ये गळती लागली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांना गळती काढण्यासाठी धडपड करावी लागली. गणेशोत्सवातच पावसाला सुरुवात झाल्यामुळे साऱयांचाच हिरमोड झाला आहे. आता पावसाला बस कर म्हणण्याची वेळ भक्तांवर आली आहे.
गुरुवारी झालेल्या दमदार पावसामुळे बाजारपेठेतील फेरीवाले, भाजीविपेते आणि इतर बैठय़ा व्यापाऱयांची तारांबळ उडाली. पावसाने बाजारपेठेमध्ये दलदल निर्माण झाली होती. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनाही पावसाचा त्रास सहन करावा लागला. या पावसामुळे पिकांना मात्र जीवदान मिळाले आहे. बऱयाच पिकांना पावसाची नितांत गरज होती. त्या पिकांना हा पाऊस पोषक ठरला आहे.
गुरुवारी सकाळपासून उष्मा जाणवत होता. दुपारपर्यंत ऊन पडले होते. मात्र त्यानंतर अचानक ढगांच्या गडगडाटासह जोरदार वारादेखील आला. त्यामुळे काही भागात दमदार पावसाला सुरुवात झाली. मात्र 5 च्या सुमारास सर्वत्रच जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहर, उपनगर परिसरात सर्वत्र जवळपास एक तासाहून अधिकवेळ पाऊस झाला. यामुळे दुचाकीस्वार, सायकलस्वार आणि पादचाऱयांना आडोसा शोधावा लागला. ऊन पडल्यामुळे बरेच जण छत्री व रेनकोट नसताना घराबाहेर पडले होते. त्यांना भिजतच घर गाठावे लागले.
स्मार्ट सिटीअंतर्गत करण्यात आलेल्या कामांचा दर्जा योग्य नसल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून रहात आहे. काही ठिकाणी गटारी भरून पाणी रस्त्यांवरून वाहत होते. एकूणच या पावसामुळे साऱयांचीच तारांबळ उडाली.