10 ऑगस्टपर्यंत पावसाचा जिह्यासाठी ‘केशरी’ इशारा
प्रतिनिधी/ रत्नागिरी
श्रावणाचे आगमन झाले आणि काही दिवसात पाऊस गायब झाला, मात्र मोराच्या साक्षीने शुक्रवारपासून दक्षिण रत्नागिरीत पावसाने धुमशान घातले आहे. शनिवारी दिवसभर संततधार सुरू होती. यामुळे जिल्हावासिय सुखावले आहेत. आता जिह्यातील निसर्गाचे रुपडेही नवा साज घेणार आहे.
श्रावणात निसर्ग बहरतो, फुलतो मात्र यासाठी दमदार पावसाची गरज असते. मात्र सलग काही दिवस पावसाने पाठ फिरवली होती. नुकतेच पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे. शुक्रवारपासून दक्षिण रत्नागिरीत पावसाचे पुनरागमन झाले आहे. रत्नागिरीत दिवसभर पावसाची मुसळधार सुरू होती. सायंकाळपर्यंत संततधार सुरू होती.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 10 ऑगस्टपर्यंत पावसाचा ‘केशरी’ इशारा देण्यात आला आहे. 7 व 8 ऑगस्ट रोजी कोकणात तुरळक ठिकाणी सोसाटय़ाच्या वाऱयासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. किनारपट्टीसह तुरळक ठिकाणी अतिवृष्टीसह काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
संगमेश्वरात पुराचे पाणी बाजारपेठेत घुसण्याची शक्यता
संगमेश्वर ः तालुक्यात जोरदार पावसामुळे पुराचे पाणी बाजारपेठांमध्ये घुसण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संगमेश्वर तालुक्यात शुक्रवारी हलक्या पावसाला सुरुवात झाली, मात्र संगमेश्वर तालुक्यात जोरदार पाऊस पडल्याने शास्त्राr, सोनवी, बावनदी, असावी आदी नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली आहे. पावसाची संततधार सुरू राहिल्यास बाजारपेठांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे. माखजन, कसबा, फुणगूस आदी बाजारपेठांना पुराचा धोका पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुसळधार पावसात मोठय़ा खड्डय़ांमुळे महामार्ग धोकादायक बनला आहे.