वांते येथील रस्ता वाहून गेला, नाणूस येथील घरामध्ये पाणी घुसून नुकसानी
वाळपई / प्रतिनिधी.
दोन दिवसानंतर पुन्हा एकदा सत्तरीतील अनेक भागाला जोरदार पावसाचा तडाखा बसला. वांते वरचावाडा येथे रस्ता वाहून गेला असून यामुळे नागरिकांना मोठय़ा प्रमाणात समस्या निर्माण होण्याची शक्मयता आहे. नाणूस येथील रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात पाणी भरल्यामुळे नागरिकांची दैनावस्था झाली. तेथील काही घरांमध्ये पाणी घुसून त्यांची किरकोळ प्रमाणात नुकसानी झाल्याची माहिती हाती आलेली आहे. दरम्यान प्राप्त झालेल्या माहितीनुसार जवळपास दोन तासांमध्ये 2.50 इंच पावसाची नोंद झाली असून अचानकपणे सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
गेल्या आठवडय़ात शुक्रवारी दोन तास पाऊस लागून वाळपई शहरांमध्ये गंभीर समस्या निर्माण झाली होती. वाळपई शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी भरून अनेक दुकानातील सामानाची नाशाडी झाली होती. त्याचप्रमाणे वाळपई सरकारी सामाजिक रुग्णालयासमोरील रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीला अडसर निर्माण झाला होता. दोन दिवसांनी पुन्हा एकदा वाळपई शहराला आज जोरदार पावसाचा तडाख बसला. सत्तरी तालुक्मयाच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस लागल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. याचा जास्त फटका वांते वरचावडा भागाला बसला असून रस्ता वाहून गेलेला आहे. गटार व्यवस्था तुंबल्याने पाणी रस्त्यावरून वाहू लागल्याने डांबर वाहून गेले. जवळपास 100 मीटर रस्ता वाहून गेला असून यामुळे सदर भागातील नागरिकांची अडचण होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. रस्त्यावरून वाहणारा पाण्याचा प्रवाह रोखण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला मात्र तो अपयशी ठरला. पाण्याचा प्रभाव एवढा जबरदस्त होता की नागरिकांचे प्रयत्न यासाठी अपुरे पडले.
या संदर्भाची माहिती मिळताच पंचायतीचे सरपंच उदयसिंग राणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. जवळपास 100 मीटर रस्त्यावरील डांबर वाहून गेले असून यामुळे या भागातील नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. यामुळे या भागाच्या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी सरपंच उदयसिंग राणे यांनी केली. यासंदर्भात वाळपई सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्या विभागाशी संपर्क साधण्यात येणार असून शक्मय तेवढय़ा लवकर या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे उदयसिंग राणे यांनी सांगितले.
दरम्यान पाऊस संपल्यानंतर स्थानिकांनी या संदर्भात पुढाकार घेऊन रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले. यावेळी सरपंच उदयसिंग राणे, स्थानिक पंच बाबुराव गावडे यांची उपस्थिती होती. सरकारकडून या कामांमध्ये दिरंगाई झाल्यास स्थानिकांना संपर्क रस्ता उपलब्ध होणार नाही. यामुळे स्थानिकांनी पुढाकार घेतला व ज्या ठिकाणी रस्ता वाहून गेला होता त्या ठिकाणी दगड व माती मारून हा रस्ता सोयीस्कर करण्यासाठी विशेष सहकार्य केले आहे. यावेळी यांची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे अनेक तरुणांनी व नागरिकांनी यासाठी पुढाकार घेतला होता.
नाणूस याठिकाणी रस्ता पाण्याखाली गेला होता. dपाण्याचा प्रवाह रस्त्यावरून वाहून या ठिकाणी नजीक असलेल्या घरामध्ये पाणी घुसले. यामुळे किरकोळ प्रमाणात नुकसानी झाल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र नागरिकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. दरम्यान या संदर्भात सदर भागातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास दोन तास जोरदार पाऊस लागल्यामुळे ही गंभीर स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाली. दोन तासाने पाऊस कमी झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले .अन्यथा या भागामध्ये मोठय़ा प्रमाणात नुकसानी होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नव्हती.
सदर भागातील रस्त्यावर पाणी भरल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. जवळपास दोन तास सदर रस्ता ओलांडणे शक्मय झाले नव्हते. यामुळे नागरिकांची अडचण झाल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे.
दरम्यान गेल्या पंधरा दिवसापासून सत्तरी तालुक्मयाच्या अनेक भागांमध्ये सातत्याने पाऊस लागत आहे .यामुळे शेती बागायतीवर याचे दुष्परिणाम होण्याची शक्मयता आहे. सत्तरी तालुक्मयाच्या अनेक भागांमध्ये झेंडू फुलांची लागवड केलेली आहे. सध्या झेंडू फुलांची बागायत फुलण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून सातत्याने पाऊस लागत असल्यामुळे झेंडू फुले कुजण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. तसे झाल्यास मोठय़ा प्रमाणात झेंडू उत्पादकांना आर्थिक फटका बसणार आहे.