वृत्तसंस्था/ कोलकाता
राजस्थानमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. दक्षिण-पश्चिम मान्सूनच्या सक्रियतेमुळे गेल्या 24 तासांत राजस्थानमधील टोंक, पाली, बुंदी आणि भिलवाडा जिह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. पावसाशी संबंधित घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासकीय पातळीवरून देण्यात आली. काही ठिकाणी ऊळांवर पाणी साचल्याने रेल्वेसेवा प्रभावित झाली. अनेक गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
बेवार जिह्यात पावसादरम्यान डोंगर खचल्याने रेल्वे ऊळांवर माती आली आहे.डोंगराचा ढिगारा ऊळांवर पडल्याने मालगाडीचे इंजिन आणि एक डबा ऊळावरून घसरला. बंदनवाडा येथील चारभुजा मंदिराजवळ एक इमारत कोसळली. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. जोधपूरच्या बोरानाडा भागात एका कारखान्याची भिंत कोसळल्याने 13 कामगार ढिगाऱ्याखाली दबले गेले. ढिगाऱ्याखाली दबल्याने तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. पाली येथे दुचाकीस्वार वाहून गेला असून तीन किलोमीटर अंतरावरील झुडपात त्याचा मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. सोजत भागात कच्चा घर कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबून गीता देवी या महिलेचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.