आपत्कालीन यंत्रणा सतर्क, वेळूस नदीसह पिसुर्ले खनिज खंदकामधील पाणी पातळी वाढली, : म्हादई, रगाडा नदीतील पाणी पातळी नियंत्रणात
प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्मयात सकाळपासून धुवाधार पाऊस लागत आहे. यामुळे नद्यांच्या पाण्याची पातळी हळूहळू वाढू लागली आहे. संध्याकाळपर्यंत वेळूस नदीच्या पाण्याची पातळी धोक्मयापर्यंत पोहोल्यामुळे आपत्कालीन यंत्रणा सतर्क झालेली आहे. रात्री उशिरापर्यंत धोक्मयाची पातळी ओलांडल्यास सभोवतालच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.
वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार सकाळपासून सत्तरी तालुक्मयात दमदारपणे पावसाने हजेरी लावली. जवळपास सर्वच ग्रामीण भागामध्ये मोठय़ा प्रमाणात पाऊस पडत आहे. दुपारी काही प्रमाणात पावसाने विश्रांती घेतली. संध्याकाळी मात्र पुन्हा एकदा आक्रमक रूप धारण केले. यामुळे अनेक भागात जाणारे रस्ते पाण्याखाली गेले होते. यामुळे काही ठिकाणी वाहतुकीला व्यत्यय निर्माण झाला. मात्र कालांतराने रस्ते मोकळे झाल्यामुळे वाहतूक सुरळीत झाली. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास काही प्रमाणात वादळी वारा झाल्यामुळे अनेक ठिकाणी नैसर्गिक पडझड झाल्याची घटना घडल्या. मात्र कोणत्याही प्रकारची नुकसानी झालेली नाही.
वेळूस नदीच्या पाण्याची पातळी वाढली
दरम्यान सकाळपासून दमदार पाऊस लागत असल्यामुळे सकाळी तालुक्मयातील रगाडा, म्हादई, वेळूस, वाळवंटी नदीच्या पाण्याची पातळी हळूहळू वाढू लागली. मात्र वेळूस नदीच्या पाण्याची पातळी संध्याकाळपर्यंत धोक्यापर्यंत पोहोचली होती. पावसाचे प्रमाण असेच सुरू राहिल्यास संबंधित भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणार येईल. सध्यातरी पाण्याची पातळी 25.5 मीटरवर असून 26 मीटरवर पोहोचल्यानंतर ही पातळी धोक्मयाची ठरू शकते, असे उपजिल्हाधिकारी परब यांनी सांगितले.
पिसुर्ले खनिज खंदकामधील पाण्याची पातळी वाढली.
गेल्या काही दिवसापासून पिसुर्ले येथील खनिज खंदकामध्ये पाण्याची पातळी वाढू लागली. जमिनीच्या पातळी पासून अजूनही पाण्याची पातळी एक मीटर कमी आहे. सदर ठिकाणी पंपिंग करण्याची यंत्रणा सज्ज केलेली आहे. गरज पडल्यास कोणत्याही क्षणी पंपिंग सुरू करून पाण्याची पातळी कमी करण्यात येईल, असे यावेळी उपजिल्हाधिकारी परब यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान उपजिल्हाधिकारी प्रवीण परब मामलेदार कौशिक देसाई, संयुक्त मामलेदार साईश नाईक, जलसिंचन खात्याचे सहाय्यक अभियंता शैलेश पोकळे व इतर अधिकाऱयांनी वेळूस नदीच्या पाण्याच्या पातळीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी वेगवेगळय़ा ठिकाणी भेटी देऊन एकूण परिस्थिती पाहणी केली. सकाळी तालुक्मयातील गोळावली, रिवे, ठाणे, कोपर्डे, चरावणे, पाली नानेली हेदोडे सातोडे वेळूस आधी भागांमध्ये पाऊस पडल्यामुळे वेळूस नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याचे नागरिकांनी सांगितले.