वार्ताहर /नंदगड
यावषी पावसाळा सुरू झाल्यापासून तब्बल महिन्यानंतर मोठय़ा पावसाला मंगळवारपासून सुरुवात झाली. या पावसामुळे कणकुंबी, जांबोटी, लोंढा, नागरगाळी, शिरोली परिसरातील शेतवडीत पाणीच पाणी झाले. पावसामुळे हंबडण व रोप लागवडीची कामे सुरू होणार असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. या पावसामुळे मलप्रभा नदीच्या पाण्याची पातळी तब्बल दहा फूट प्रवाहित झाली आहे.
मंगळवारी पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाची दिवसभर धुवाधार सुरूच होती. त्यामुळे दुपारपर्यंत तालुक्मयाच्या दक्षिण व पश्चिम भागात पाणी झाले होते. पावसामुळे मलप्रभा, पांढरी या नद्यांबरोबरच भांडुरा, कळसा, हलात्री, कुंभारनाल्यामध्ये पाणी झाल्याने ते प्रवाहित झाले आहेत. त्यांच्या पाणीपातळीतही सायंकाळपर्यंत वाढ झाली. तालुक्मयातील तलावांनी तळ गाठला होता. या पावसामुळे तलावातून पाणी साचत आहे. पावसामुळे गटारी तुडुंब भरून वाहत आहेत. तालुक्मयाच्या काही गावांतून पावसाळय़ापूर्वी गटारींची स्वच्छता करण्यात आली नाही. अशा गावांतील गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहत होते.खानापूर-पणजी महामार्गावरील रुमेवाडी क्रॉसवर रस्त्यातच मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे तब्बल दोन फुटांहून अधिक पाणी खड्डय़ात साचल्याने या धोकादायक खड्डय़ातूनच दुचाकी व चार चाकी वाहनधारकांना आपला जीवघेणा प्रवास करावा लागला.
पावसाचा जोर वाढल्याने छत्र्या व रेनकोट खरेदीसाठी शालेय विद्यार्थ्यांबरोबरच अनेक नागरिकांनी दुकानांमध्ये गर्दी केली होती. कौलारू घरांतून पावसाचे पाणी शिरले होते.
अनेक गावांतील वीज गायब
मंगळवारी झालेल्या मोठय़ा पावसामुळे दुपारनंतर तालुक्मयाच्या दक्षिण व पश्चिम भागातील वीज वाहिन्यांवर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्याने वीज पुरवठय़ात व्यत्यय निर्माण झाला होता.