शासनाने नियम शिथिल करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसहाय करण्याची मागणी
बाळासाहेब माळी,शिरोळ
Heavy Rains In Shirol : शिरोळ तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले शासनाच्या नियमानुसार 24 तासाचा 65 मी मी पाऊस झाला तरच नुकसान भरपाई मिळू शकते नुकतेच अवघ्या पाच तासांमध्ये 48 मी मी पाऊस झाला असून देखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून वंचित रहावे लागणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने नियमांमध्ये शिथिल करावी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देऊन सहकार्य करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
शिरोळ तालुक्याला महापुराने तारले व अतिवृष्टीने मारले आहे.हाता तोंडाला आलेली पिके कुजून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.नगदी पिकांना मोठय़ा प्रमाणात परतीच्या पावसाचा फटका बसल्याने शेतकऱयांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.मात्र शासनाच्या धोरणानुसार एका दिवसात 65 मिलिमीटर पाऊस पडला तरच अतिवृष्टी ग्राह्य धरली जाते यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागणार अशी परिस्थिती सध्या तरी निर्माण झाली आहे.
शिरोळ तालुक्यास नेहमीच महापुराचा धोका संभवतो या आधारावर येथील शेतकरी आपली शेती पिकवित असतात प्राधान्याने ऊस सोयाबीन भुईमूग केळी उडीद हरभरा गहू खपली शाळू विविध प्रकारचे भाजीपाला असे खरीप व रब्बी नगदी पिक घेऊन येणाया उत्पन्नातून आपल्या संसाराचा गाडा हाकत असतात.यावर्षी महापुराचे संकट टळले त्यामुळे शेतकऱ्यांची थोडीफार चिंता मिटली होती.पण परतीच्या पावसाने मोठय़ा प्रमाणात हजेरी लावली एका दिवसात तर 48 मिलिमीटर इतका पाऊस पडला पावसाचे पाणी उभ्या सरीत साचू लागले यामुळे पिक कुजू लागली आहेत.ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतात आहे त्या शेतकयांची परिस्थिती बिकट झाली आहे.
अधिक वाचण्यासाठी- प्रश्न सुटणार नसतील तर बैठक कशाला बोलविली? खासदार संतप्त
परिणामी या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे अनेक शेतकऱ्यांची भुईमूग पाण्यातच आहे उशिरा लागण केलेल्या ऊस क्षेत्रात पाणी साचल्याने या पिकांची वाढ खुंटली असून या शेतकऱ्यांना दुबार ऊस लागण करावी लागणार आहे.परतीच्या पावसामुळे आणि हवामानातील बदलाचा परिणाम विशेषता केळी या पिकावर होत असून झाडावरील घढ जमिनीवर पडत आहेत त्या शेतकयांनाही आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.या दिवसात हरभरा गहू खपली भुईमूग उडीद यासह अन्य पिकांची पेरणी केली जात असते यासाठी शेतकऱयांनी आपल्या शेत जमिनीची मशागत केली होती पण पावसामुळे पेरणीसाठी शेतात घात नसल्यामुळे अनेक शेतकयांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत पुन्हा एकदा या शेतकयांना शेत जमिनीची मशागत करावी लागणार त्यामुळे अशा शेतकऱयांना पुन्हा आर्थिक खर्च सोसावा लागणार आहे.
अधीक वाचण्यासाठी- दुधाचे दर आणखी वाढणार; चेतन नरकेंच स्पष्टीकरण
शिरोळ तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले त्यामुळे यावर्षी काढलेले कर्ज शेतकऱ्यांना भागवताना तारेवरची कसरत करावी लागणार अपेक्षित उत्पन्न मिळाले नसल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना आर्थिक चणचन सुद्धा भासणार या परिस्थितीचा विचार करून शासनाकडून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांच्यातून होऊ लागली आहे. पण शासनाचे धोरण पाहिल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागणार अशी परिस्थिती सध्या आहे.
शिरोळ तालुका शेतकरी चळवळीचा तालुका म्हणून ओळखला जातो शेतकऱयांच्या मतावर येथील शेतकरी नेते खासदार,आमदार जिल्हा परिषद,पंचायत समिती सभापती यासह अन्य पदावर पोहोचले होते.पण ऊस दर आंदोलनाशिवाय शेतकऱ्यांच्या इतर पिकांना हमीभाव मिळावा तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी कोणीच आवाज उठवत नाही शेतकरी प्रश्नाचे राजकीय भांडवल करून स्वार्थ साधणाऱ्यां शेतकरी नेत्यांना बळीराजाच्या डोळ्यातील अश्रू दिसत नाहीत का असा संतप्त सवाल करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करावेत अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करण्याचा आदेश अद्याप प्राप्त झालेला नाही. तालुक्यामध्ये एका दिवसात 48 मी मी पाऊस झाला आहे. 65 एमएम पाऊस झाला तरच नुकसान भरपाई चे पंचनामे केले जातात कोणताही शासनाचा आदेश आला नसल्याचे त्यांनी सांगितले.