पुणे / प्रतिनिधी :
सक्रिय मान्सून, सशक्त पश्चिमी वाऱ्यांमुळे देशात तसेच राज्यात मान्सूनची दमदार बॅटिंग होत असून, पुढील चार ते पाच दिवस कोकण-गोवा किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा व विदर्भातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
जूनमधील पावसाच्या खंडानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात पाऊस परतला आहे. यामुळे दुबार पेरण्यांचे संकटही टळण्याची शक्यता वाढली आहे. जून महिन्यात देशभरात सरासरीपेक्षा कमी पावसाची नेंद झाली. मात्र, जुलै महिन्यात सरासरीइतक्या पावसाचे भाकित हवामान विभागाने केले आहे.
उद्रार, ओरिसा तसेच लगतच्या झारखंडच्या भागावर कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. तसेच सक्रिय मान्सून व पश्चिम किनारपट्टीवर सशक्त पश्चिमी वाऱ्यांमुळे सर्वत्र जोरदार पाऊस होत आहे. गेल्या 24 तासांत गुजरात तसेच संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पावसाने हजेरी लावली. उद्रार कर्नाटक, ओरिसा, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेशातही पावसाचे प्रमाण अधिक होते. याशिवाय पूर्व, पूर्वोत्तर भारत, तुरळक भाग वगळता संपूर्ण देशात जोरदार पाऊस सुरू आहे. महाराष्ट्रातही कोकण-गोवा, विदर्भात मुसळधार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र व विदर्भात अनेक भागात जोरदार पाऊस झाला. घाट परिसरात पावसाचे प्रमाण अधिक आहे.
कोकण-गोव्याला आंरेज अलर्ट
पुढील चार दिवस कोकण-गोव्याला ऑरेंज अलर्ट आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. 7 तसेच 8 जुलै रोजी मध्य महाराष्ट्रातही ऑरेंज अलर्ट आहे.