प्रतिनिधी /पणजी
राज्यात सोमवारी सर्वत्र जोरदार पावसाची नोंद झाली. मान्सून खऱया अर्थाने गोव्यात आता सक्रिय झाल्याचे दिसून आले. आज 21 रोजी राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडणार, असे हवामान खात्याने जाहीर केले असून या अनुषंगाने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रविवारी राज्यात सर्वत्र पाऊस झाला, मात्र तो त्या तुलनेत कमीच होता आणि रविवारी रात्री उशिरा राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाची नोंद झाली. सोमवारी सकाळपासून पावसाने बराच जोर धरला. दुपारपासून पावसाचा जोर वाढत गेला आणि रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप चालूच होती. हवामान खात्याने पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्मयता व्यक्त केली आहे.
यंदा जूनमध्ये फारच कमी पाऊस आतापर्यंत पडलेला आहे. मात्र सोमवारी पावसाने बराच जोर लावलेला असून संपूर्ण गोव्यात रात्री उशिरापर्यंत पाऊस चालू होता. या पावसामुळे शेतकऱयांना शेतीची कामे करायला संधी मिळाली. गेले कित्येक दिवस पाऊस अधूनमधून ये जा करीत होता. शेतीला मात्र पूरक असा पाऊस पडत नव्हता. हवामान खात्याने दोन दिवसापूर्वीच अंदाज वर्तविला होता. त्यानुसार 18 व 19 रोजी मुसळधार पावसाची शक्मयता होती, प्रत्यक्षात मात्र दोन्ही दिवस अल्प प्रमाणात पाऊस पडला. आता सोमवारपासून राज्यात जोरदार पाऊस झाला प्रारंभ झाला असून पुढील चार दिवस तो मुसळधार पडण्याची शक्मयता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.