Advertisements
प्रतिनिधी / बेळगाव : आज सायंकाळीसुद्धा रहदारी पोलिसांनी पिरनवाडी नाक्यावर चार वाजल्यापासून सायंकाळी सातपर्यंत अवजड वाहनांची शहरात येण्यासाठी बंदी घातली आहे. जवळजवळ सहा ते सात रहदरी पोलीस व वरिष्ठ अधिकारी ठाण म्हणून बसले आहेत. त्या व्यतिरिक्त वरिष्ठ पोलीस अधिकारी दर तासाला पोलीस वाहनातून फेरी मारत आहेत. उद्यापासून सकाळी 08 ते 11 व सायंकाळी 04 ते 07 वाजेपर्यंत अवजड वाहनांना शहरात येण्यासाठी बंदी घालण्यात येणार आहे. सायंकाळी सातनंतर टप्प्याटप्प्याने अवजड वाहन सोडण्यात येणार आहेत. जेणेकरून शहरात वाहतूक कोंडी होऊ नये.