नंदगड प्रतिनिधी – काही दिवसापूर्वी कॅम्प परिसरात अवजड वाहनाने ठोकरल्याने एका शालेय विद्यार्थ्याला आपले प्राण गमवावे लागले होते. तेव्हापासून शहरांमध्ये दिवसाच्या वेळी अवजड वाहनांना प्रवेश बंदी होती. तर रात्री सहा किंवा सात नंतर अवजड वाहनांना शहरात प्रवेश दिला जात होता. पिरणवाडी येथे अवजड वाहनांना अडवून प्रवेश बंद करण्यात येत होता. शहरात अशा प्रकारची कुठलीही दुर्घटना घडू नये याची काळजी पोलीस प्रशासन व मनपाकडून घेण्यात येत होती . परंतु एन दिवाळीच्या तोंडावर नागरिकांची गर्दी बेळगाव शहरात मोठ्या प्रमाणात वाढली आहे आशात सर्व अवजड वाहनांच्या मालकांनी रस्त्यावर उतरून आम्हाला शहरात प्रवेश द्या, अशी मागणी केल्याने अचानक पणे 50 ते 60 अवजड वाहने रस्त्यावर मोकळी सोडण्यात आली आहेत. पिरणवाडी ते थर्ड रेल्वे गेट इथपर्यंत पूर्ण ट्राफिक जाम होऊन, ट्रॅफिकची समस्या निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासन व मनपा यावर उपाययोजना करणार का? की आणखी एखादा अपघात झाल्यानंतर प्रशासनाला जाग येणार अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांतून येत आहे.
Previous Articleकामगार बसपास योजना वेबसाईटच्या कचाट्यात
Next Article 40 ग्राम पंचायतींना मिळणार कचरावाहू वाहने