बेळगाव – महाराष्ट्र- कर्नाटक सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांना देण्यात येणाऱ्या निवृत्ती वेतनामध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र शासनाकडून सीमा लढ्यातील हुतात्म्यांच्या वारसांना दरमहा १० हजार रुपये निवृत्ती वेतन दिले जात असून त्यामध्ये वाढ करून दरमहा २० हजार इतके करण्यात आले आहे. याबाबत शासनाने आपला निर्णय लागू केला असून १ नोव्हेंबर २०२२ पासून निवृत्ती वेतन वाढ लागू करण्यात आले आहे. बेळगाव जिल्ह्यातील ११ तर मुंबईतील ६७ वारसांना वाढीव निवृत्ती वेतनाचा लाभ होणार आहे.
Trending
- पहिल्या टप्प्यात 60 टक्क्यांवर मतदान
- लखनौचा चेन्नईवर 8 गड्यांनी एकतर्फी विजय
- अंतिम सत्रात सेन्सेक्स 600 अंकांनी वधारला
- दिल्ली कॅपिटल्सची आज आक्रमक सनरायझर्सविरुद्ध कसोटी
- उत्तेजक चाचणीतून शालू चौधरी दोषमुक्त
- राजदुतावासावरील छाप्याने राजनैतिक संबंध संपुष्टात
- आबासोव्हला नमवून गुकेश पुन्हा संयुक्तरीत्या आघाडीवर
- इशा सिंग, भावेश शेखावत आघाडीवर