बाबुराव ठाकुर महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत
वार्ताहर /खानापूर
खानापूर तालुक्मयाच्या जांबोटी भागात पदवीपूर्व शिक्षणाची सोय लोकमान्य सोसायटीने उपलब्ध करून या भागातील उच्च शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम हाती घेतले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आजच्या आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करून ध्येय साध्य केले पाहिजे, असे विचार आरपीडी कॉलेजच्या प्राचार्या डॉ. शोभा नाईक यांनी व्यक्त केले. लोकमान्य सोसायटी संचालित जांबोटी येथील बाबुराव ठाकुर पदवीपूर्व महाविद्यालयात प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ तसेच बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव असा संयुक्त कार्यक्रम मंगळवारी पार पडला. अध्यक्षस्थानी सोसायटीचे संचालक अनिल चौधरी होते.
स्वागत व परिचय प्रा. कृष्णा पाटील यांनी केले. त्यानंतर मान्यवराच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पूजन झाले. यावेळी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
प्राचार्या पूजा पाटकर यांनीही शाळेच्या प्रगतीबद्दल विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला संचालक नितीन कपिलेश्वरकर, अण्णासाहेब कुडतरकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विद्यार्थिनी सानिया गोवेकर हिने केले. श्रावणी देसाई यांनी आभार मानले.