प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राकसकोप धरणाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस वाढ होत असून कोणत्याही क्षणी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे हिंडलगा पंपिंग स्टेशनमध्ये शिरलेले पाणी कमी होईपर्यंत बेळगाव शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय येऊ शकतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अनिवार्य प्रसंगी पाणीपुरवठ्यात व्यत्यय झाल्यास नागरिकांनी एल अँड टी कंपनीशी सहकार्य करण्याचे आवाहन केयुआयडीएफसीचे व्यवस्थापक संतोष कावी यांनी पत्रकाद्वारे केले आहे.