बेळगाव / प्रतिनिधी : गेल्या तीन दिवसापासून संततधार पावसामुळे पाऊस सुरू आहे. त्यामुळे बेळगाव शहर तालुका आणि खानापूर तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक शाळांना व अंगणवाडी केंद्रांना सुट्टी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी ही माहिती दिली.
सकाळी सुट्टीची घोषणा करण्यास उशीर केल्यामुळे बरेच विद्यार्थी शाळेकडे गेले आहेत. पण सुट्टीमुळे त्यांना परतावे लागणार आहे.
दरम्यान, मंगळवारी मोहरमची सुट्टी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सलग दोन दिवस सुट्टी आहे. गोल्फ कोर्स मैदाना परिसरातील जंगलात बिबट्याचा वावर असल्याने रविवारी रात्रीच येथील 22 हून अधिक शाळांना सुट्टी दिली होती.