लांब पल्ल्याच्या प्रवासी बसेस अडकल्या
प्रतिनिधी /वाळपई
होंडा गावकरवाडा येथून प्रवासी बसेस तसेच अवजड मालवाहतूक बंदीचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी जारी केला असताना दिवस व रात्रभर अशा प्रकारची वाहतूक होत असल्यामुळे गावकरवाडा भागातील संतप्त बनलेल्या ग्रामस्था?नी रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास वाहतूक रोखून धरली. यामुळे कर्नाटक, हैदराबाद, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आदी भागांमध्ये जाणाऱया लांब पल्ल्याच्या प्रवासी बसेस त्याचप्रमाणे अवजड प्रकारची वाहतूक करणारी वाहने मोठय़ा प्रमाणात अडकून पडली होती. स्थानिक पोलीसांनी ग्रामस्थाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्था?नी वाटाघाटी करण्यास नकार दिल्यामुळे रात्री उशिरापर्यंत वाहतूक ठप्प झाली होती.
होंडा पंचायत क्षेत्रातील गावकरवाडा भागातून मोठय़ा प्रमाणात अवजड प्रकारची वाहतूक होत आहे. त्याचप्रमाणे इतर राज्यात जाणाऱया लांब पल्ल्याच्या प्रवासी बसेस याच मार्गाचा अवलंब करीत आहे. साखळी येथील पुलाखालून ही वाहने सुटत नसल्यामुळे अशा प्रकारची वाहने या मार्गाचा अवलंब करू लागलेली आहेत. मात्र याचा मोठय़ा प्रमाणात त्रास गावकरवाडा येथील ग्रामस्था?ना भोगावा लागत आहे. याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱयांनी या भागातून अशा प्रकारच्या वाहतुकीला बंदी घातलेली आहे .मात्र या बंदी आदेशाचे अजिबात पालन होत नाही असे ग्रामस्था?चे म्हणणे आहे. दोन महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे ग्रामस्था?नी वाहतूक रोखून धरली होती. त्यावेळी पोलिसांनी ग्रामस्था?चे वाटाघाटी करून हा वाद संपुष्टात आणला होता. त्याचप्रमाणे या भागातून अशा प्रकारची वाहतूक होणार नाही या संदर्भात आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाची अजिबात पूर्तता झालेली नाही. आज पुन्हा एकदा त्रस्त ग्रामस्था?नी वाहतूक रोखून धरली. यामुळे गावकरवाडा भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाहनांची गर्दी झाली होती. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन ग्रामस्था?शी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्था?नी कोणत्या प्रकारची तडजोड करण्यास नकार दिल्यामुळे रात्री उशिरापर्यंत वाहतूक ठप्प झाली होती.
यासंदर्भात अधिक माहिती देताना स्थानिक दीपक गावकर यांनी सांगितले की या भागातून वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱयांच्या बंदीचा आदेश आहे असे असताना सुद्धा सदर आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल त्यांनी पोलीस स्थानिक, पंचायत व राजकारण्यांना दोषी धरले.
महत्त्वाचे म्हणजे या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना घनदाट लोकवस्ती आहे.
रात्रभर वाहने या भागातून घोळत असल्यामुळे कर्कश वाहनांच्या हॉर्नमुळे या भागातील ग्रामस्था?ची निद्रानाश होते. त्याचप्रमाणे दिवसाढवळय़ा अनेकवेळा या भागातील ग्रामस्था?ना धोकादायक अपघातांना सामोरे जावे लागत असते. यामुळे या भागातून वाहतूक पूर्णपणे बंद करावी अशा प्रकारची मागणी अनेक वेळा करण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज पुन्हा एकदा सदर वाहतूक रोखण्याची पाळी ग्रामस्थावर आल्याचे दीपक गावकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करतात आणि एका युवकाने सांगितले की अवजड प्रकारच्या वाहतुकीच्या माध्यमातून पोलिसांना मोठय़ा प्रमाणात हप्ता मिळत असतो. यामुळे या ग्रामस्था?च्या जीवाची कोणतीही काळजी पोलिसांना नाही. यामुळे त्यांच्या डोळय़ादेखत हा सर्व प्रकार घडत असल्यामुळे त्यांनी तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त केला.
होंडा गावकरवाडा भाग हा होंडा पोलीस चौकी पासून फक्त 200 मीटर अंतरावर आहे. तरीसुद्धा पोलीस यंत्रणा या भागातील अनेक प्रकारच्या वाहतुकीवर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून असमर्थ ठरल्याचा आरोप ग्रामस्था?नी केला आहे.
या संदर्भातील तक्रारी अनेक वेळा स्थानिक लोकप्रतिनिधी करण्यात आल्या .मात्र त्यासंदर्भात अजून पर्यंत गांभीर्याने लक्ष देण्यात आलेले नाही. यामुळे सध्यातरी होंडा भागातील ग्रामस्था?चा जीव धोक्मयात सापडला असून जोपर्यंत अशा प्रकारची वाहतूक व प्रवासी वाहतूक बंद होत नाही तोपर्यंत ग्रामस्था?ची सुरक्षितता धोक्मयात आल्याचे ग्रामस्था?नी स्पष्ट केले आहे.
दरम्यान रात्री उशिरापर्यंत ग्रामस्था?ची समजूत काढण्याचा प्रयत्न स्थानिक पोलिस यंत्रणेने केला .मात्र त्याचा अजिबात फायदा झाला नाही. जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी उपजिल्हाधिकारी व स्थानिक मामलेदाराची असते. मात्र त्यांनीही याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्था?नी नाराजी व्यक्त केली आहे.