प्रतिनिधी/ सातारा
शहरातील स्वच्छतेवर पालिका कोट्यावधी ऊपये खर्च करते. खर्च कऊनही स्वच्छता तशीच असल्याने कचऱ्यावरचा पैसा कचऱ्यात जातो की काय असाच प्रश्न उपस्थित होत आहे. घंटागाडी चालकावर कोणाचेही नियंत्रण राहिले नसल्याने घंटागाड्यांच्या ठेकेदाराला त्याचे काहीच घेणेदेणे नाही. घंटागाड्या कचरा न उचलताच शहरातून धावत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कचरा मात्र तसाच ठिकठिकाणी रस्त्यावर दिसत आहे. ज्या ठिकाणी कचरा पडतो आहे, कचरा टाकला जातो आहे त्यांच्यावर पालिकेकडून कारवाई होताना दिसत नाही.
सातारा पालिकेच्या आरोग्य विभागात आता तीन कर्मचाऱ्यांची वाढ झालेली आहे. परंतु काम सोपे होण्याऐवजी कामामध्ये त्रुटी या वाढतच चालल्या आहेत. तीन आरोग्य निरीक्षक सेवेत ऊजू झाल्यानंतर कामाचे वाटप करण्यात आलेले आहे. घंटागाडी चालकावर तर नियंत्रणच नाही. घंटागाडी चालकाने ठेका घेतला असला तरीही त्याचे कसलेही नियंत्रण नसल्याने त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. तरीही सुधारणा झालेली नसते. शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर कचरा पडल्याचे दिसून येतो आहे. त्यामध्ये पोवईनाका येथे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याच्या बाजूच्या भिंतीलगत तेथील काही व्यापारी आर्वजून कचरा टाकत असतात. त्या व्यापाऱ्यांना कित्येक नागरिकांनी कचरा टाकू नका. घंटागाडीतच टाकत जावा असे सांगितले. तर व्यापाऱ्यांकडूनही घंटागाडी ही कधीही येते त्यामुळे आम्हाला पर्याय नाही, असे उत्तर दिले जाते.
दरम्यान, शहरात सदरबाजारमध्ये तर कचऱ्याचे आगारच बनले आहे. रस्त्याचे कोपरे कचऱ्याने भरलेले दिसत आहेत. मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या एकट्याचे प्रयत्न थिटे पडत आहेत.